शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

कोयनेचे पाणी बंद केल्यास धरणाचे दरवाजे तोडणार, संजय विभूते यांचा इशारा 

By संतोष भिसे | Published: December 08, 2023 5:53 PM

विटा : कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. पण, यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु, ...

विटा : कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. पण, यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु, आताचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा का केला आहे ? सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवारपासून बंद केल्यास हजारो शेतकऱ्यांसह कोयनेवर जाऊन धरणाचे दरवाजे तोडू, असा इशारा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सरकारला दिला.यावेळी एकाच सरकारमध्ये असलेले पालकमंत्री देसाई, खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केला. विटा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेची (उबाठा) संयुक्त पत्रकार परिषद झाली. कोयना धरणातूनसांगलीसाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवार, ११ डिसेंबरपासून बंद हाेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख विभूते व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. मुळीक यांनी भूमिका मांडली.विभूते म्हणाले, सरकारवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी कोयना धरणातील पाण्याचा प्रश्न विनाकारण निर्माण केला जात आहे. वास्तविक कोयनेतील पाण्यावर सातारा जिल्ह्यातील जलसिंचन योजना अवलंबून नाहीत. मंत्री देसाई यांना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एवढा पुळका असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण कराव्यात. कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद केल्यास शेतकरी स्वत: हातात कुदळ, पाटी, खोरे, टिकाव घेऊन कोयना धरणाचे दरवाजे तोडतील.

राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतूद कपात करून नव्याने पाणी वापर करण्याबाबत समितीने सुचविलेली पाणी कपात अन्यायकारक आहे. सन १९६८ पासून २०१५ पर्यंत अनेकदा कोयनेतील पाणीसाठा कमी झाला होता. तरीही सांगली जिल्ह्याला कधीही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. कोणतीही योजना बंद पडली नाही किंवा वीज कपातही करावी लागली नाही. मग, आताच हा प्रश्न का निर्माण झाला आहे. यात मंत्री देसाई, खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असून, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हस्तक्षेप थांबवावा व शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा.या पत्रकार परिषदेस सुशांत देवकर, किसन जानकर, ॲड. संदीप मुळीक, विशाल पाटील, संतोष जाधव, सुवर्णा पाटील, महेश फडतरे, सागर कदम उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणीShiv Senaशिवसेना