शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

समान नागरी कायदा:..तर त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील, माजी मंत्र्यांने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:23 IST

परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

इस्लामपूर : भारतीय जनता पार्टीने देशात समान नागरी कायदा आणला तर तो भाजपलाच अहिताचा होईल. हा कायदा आणला गेला तर भाजपला पुन्हा सत्तेवर यायला किती वर्षे घालवावी लागतील याचा सुज्ञांनी विचार करावा, असे मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डांगे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता म्हणून बोलणाऱ्या गृहस्थांनी केलेल्या ‘भारतीय जनता पार्टीने समान नागरी कायदा आणावा, तो त्यांना फायद्याचा ठरेल’ अशा वक्तव्याचा हवाला दिला आहे.

डांगे यांनी म्हटले आहे की, घटनाकारांनी ज्या कारणामुळे समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागासांच्या विशेष प्रवर्गासाठी आरक्षण निर्माण केले, त्याचे मुख्य कारण आज ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो त्या जातीजमातींचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना आरक्षण दिले होते. आरक्षणाचा फायदा घेऊन ५-१० टक्के लोकांचेच जीवनमान कदाचित सुधारले आहे, असे म्हणता येईल. परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

ही वस्तुस्थिती नजरेआड करून भाजपने समान नागरी कायदा करून मागास समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित ठेवले, तर त्याचे उलट पडसाद उमटून आरक्षणाचे कवच असलेला हा मागासलेला समाज भाजपच्या विरोधात जाऊन त्याचे दुष्परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील. पक्षाची पुुन्हा सत्तेवर येण्याची संधी गमवावी लागेल, हे उघड सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागतोय, त्यांना तुम्हास आरक्षण मिळणार नाही, अथवा त्यापुढे जाऊन मराठा समाज प्रगत आहे. त्यास आम्ही आरक्षण देणार नाही, असे भाजपचा कोणी नेता अथवा राज्यकर्ते म्हणू शकत नाहीत. उलट मराठा समाजाला तात्पुरते का होईना बरे वाटण्यासाठी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी भाजपचे राज्यकर्ते सकारात्मकपणाचा उसना आव आणत आहेत, असेही प्रसिद्धीपत्रकात डांगे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा