शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 11:57 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

सांगली : आत्मनिर्भर भारत, फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, विश्वगुरु हे सर्व म्हणायला सोपे आहे, पण त्यासाठी आपल्याला बदलायला हवे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा बदल स्वत:मध्ये करायला हवेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा लागेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. स्मरणिका प्रकाशनही पार पडले. गडकरी म्हणाले की, सत्ता, संपत्ती अन् सुख पायाशी लोळण घालत असतानाही उपभोगशून्य असलेल्या शिवाजी महाराजांनी रयतेच्या उद्धारासाठी व विकासाकरीता सेवा केली. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला तर आपला समाज व देश आता आहे त्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाईल.ते म्हणाले, कोणताही व्यक्ती हा जात, धर्म, लिंग यानुसार छोटा किंवा मोठा होत नाही. त्याच्यातील गुणांनी तो मोठा होत असतो. शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा भांडार होते. सर्वांना बरोबर घेऊन कसे राज्य करायचे, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे.मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वागत, तर निमंत्रक माजी खासदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विलासराव जगताप, सदाशिवराव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, शिवाजीराव नाईक, रासपचे नेते महादेव जानकर, माजी खासदार राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार, जनसुराज्य पक्षाचे समीत कदम आदी उपस्थित होते.

जात, पैसा, गुन्हेगारीवर राजकारणसध्या जात, पैसा, गुन्हेगारी हे राजकारणाचे अंगीभूत घटक बनले आहेत. या गोष्टी समाजासाठी चांगल्या नाहीत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

अभिमानाने छाती फुगतेदेशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर लोक नतमस्तक होताना दिसतात, तेव्हा मराठी माणूस म्हणून आपली छाती अभिमानाने फुगते, असे मत राष्ट्रवादी पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

छत्रपतींच्या आडनावाने राज्याची ओळख नाहीशरद पवार म्हणाले की, देशात पूर्वी मोघलांचे, आदिलशाहीचे, देवगिरीच्या यादवांचे राज्य अशी वेगवेगळ्या राज्यांची ओळख होती. मात्र, या देशात छत्रपती शिवाजी महाराज असा एकच राजा होऊन गेला ज्याच्या आडनावाने कधी राज्य ओळखले जात नाही. भोसलेंचे राज्य म्हणून ओळख न होता शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते.

मराठा समाजाची परंपरा कौतुकास्पदमराठा केवळ एक जात नाही. सर्व जाती-धर्मांचा आदर करुन त्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे. सांगलीत मराठा समाज संस्थेने तो विचार अनेक सामाजिक उपक्रमातून जपला आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार गेले, गडकरी आलेशरद पवार व नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावर येणार म्हणून उपस्थितांत उत्सुकता होती. मात्र, कार्यक्रमांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शरद पवार नियोजित वेळेपेक्षा लवकर आले. भाषण करुन ते निघून गेल्यानंतर गडकरींचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

सांगलीच्या दुष्काळी भागातून नवा महामार्गमुंबईच्या अटल सेतूपासून पुणे व पुण्यातून बेंगलोरपर्यंत नवा राष्ट्रीय महामार्ग साकारला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून तो जाणार असल्याने येथील विकासला चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींना व्यक्तीचित्र नवकृष्णा व्हॅली महाविद्यालयाचे प्रा. सुमेध कुलकर्णी यांनी शुक्रवारी गडकरी यांना त्यांचे व्यक्तिचित्र भेट दिले. व्यक्तिचित्रासाठी कुलकर्णी यांना सत्यजित वरेकर, होळकर, पूजा सकटे यांचे मार्गदर्शन लाभले

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरीSharad Pawarशरद पवार