शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

sangli news: खटावमध्ये संक्रांतीला तिळगुळाबरोबर पोती भरुन वाटतात साखर, दीड-दोनशे वर्षांपासूनची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:07 IST

नवस फेडण्यासाठी ही पोत्या-पोत्याने साखरेचे वाटप

लिंगनूर : खटाव (ता. मिरज) येथील मकर संक्रांतीचा सण अवघ्या महाराष्ट्रात कदाचित सर्वाधिक गोड ठरला असावा. कारण यंदा सणानिमित्त गावकऱ्यांनी थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल १७० पोती साखर वाटून तोंड गोड केले.गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून खटावमध्ये संक्रांतीनिमित्त साखर वाटपाची अनोखी परंपरा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रातीला हा अनोखा सोहळा साजरा होतो. काळ बदलला, तरी खटावकरांनी परंपरेचा विसर पडू दिला नाही. संक्रांतीला गावोगावी तिळगूळ वाटप होते, खटावचे ग्रामस्थ मात्र पोती भरभरुन साखर वाटतात. त्यात तीळगूळ ही मिसळतात.

ग्रामदैवत सोमेश्वर व अमोघसिद्ध देवांच्या पालखीसमोर वाटप होते. घरटी किमान दोन किलो साखर हमखास वाटली जाते, शिवाय नवस फेडण्यासाठी ही पोत्या-पोत्याने साखरेचे वाटप भाविक करतात. त्यामुळे संक्रांतीच्या अगोदर काही दिवस गावातील व्यापारी तीळगूळ ऐवजी साखरेचाच घाऊक साठा करुन ठेवतात.संक्रांतीला देवांची पालखी जवळच्याच ऐनापूर (ता. अथणी) गावात सिद्धेश्वराच्या भेटीला नेली जाते. तेथे कृष्णा नदीत स्नान घालून सकाळी गावात आणतात. गावाजवळ येईल, तशी पालखी पळवतात. फटाक्यांच्या आतषबाजीत व धनगरी ढोलांच्या निनादात गावकरी स्वागत करतात.किंक्रांतीला दिवसभर पालखी गावाबाहेर सोमेश्वर मंदिरात थांबते. सायंकाळी आंबील, भाताचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी गावातील मंदिराच्या मैदानात येते. तेथे गावकरी पहिली साखर देवाला देतात. भक्तांच्या साखरेने पालखी भरुन जाते. त्यानंतर गावभर साखर वाटपाचा सोहळा सुरु होता.ग्रामस्थांकडे साखरेच्या पिशव्याच पिशव्यामुठी-मुठीने आणि पाटीपाटीने एकमेकांना साखर वाटली जाते. परस्परांना भरविली जाते. कन्नड आणि मराठीत शुभेच्छा दिल्या जातात. रात्री अकरापर्यंत हा अनोखा साेहळा चालतो. ग्रामस्थांचे खिसे साखरेने ओथंबून जातात. साखरेने भरलेल्या पिशव्या घेऊन घराकडे परतणारे गावकरी रस्तोरस्ती दिसतात. यावर्षी सोमवारी (दि. १६) रात्री अवघ्या चार तासांत ५० किलोंच्या १७० पोती साखरेचे वाटप ग्रामस्थांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीMakar Sankrantiमकर संक्रांती