शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
3
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
5
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
6
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
7
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
8
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
9
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
10
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
11
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
12
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
13
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
14
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
15
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
17
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
18
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
19
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
20
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार

गावगाड्याकडून नागरिकीकरणाकडे: गावाचा अनियंत्रित विस्तार, गायरानात अतिक्रमणे फार 

By संतोष भिसे | Updated: December 14, 2024 18:07 IST

ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज

संतोष भिसेसांगली : गेल्या काही वर्षांत मोठ्या गावांचे नागरिकीकरण वेगाने होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मोठी गावे वेगाने विकसित होत आहेत. या तुलनेत तेथे नागरी सुविधा देण्यात ग्रामपंचायती सक्षम नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या पाच-सात पटींनी वाढली तरी गावठाण मात्र वाढले नाही. परिणामी लोकांनी अतिक्रमणे करत गायरानात अतिक्रमणे व मनमानी वस्त्या केल्या आहेत.गावकुसाबाहेर वसाहती वाढल्या, शेकडो घरे वाढली; पण तेथे रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आदी सुविधा देण्यात ग्रामपंचायतींची ताकद अपुरी पडत आहे. विशेषत: शहरांलगतच्या गावांत ही समस्या गंभीर आहे. शहर जवळ असल्याने ही गावे वेगाने वाढली. शहराबाहेर शांत वातावरणात राहू इच्छिणाऱ्यांनी या गावांत जागा घेऊन बंगले उभारले. शहरातील धनिकांनी गुंतवणूक म्हणून शेजारच्या या गावांत जमिनी खरेदी करून ठेवल्या. पण या ग्रामपंचायतींना ‘नगरविकास कशाशी खातात?’ हेच माहिती नाही.अजगरासारख्या वाढणाऱ्या वसाहतींना नियंत्रित करण्याचा अजेंडा ग्रामविकास किंवा नगरविकास विभागाकडे नाही. विस्तारित वसाहतीतील रहिवासी सुविधांसाठी ग्रामपंचायतींशी वर्षानुवर्षे माथेफोड करीत आहेत. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदी प्राथमिक सुविधांसाठी त्यांचा दररोजच संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे २०० ग्रामपंचायतींची लोकसंख्या १५ हजार ते २० हजारांदरम्यान आहे. त्या नगर पंचायत होण्यास पात्र आहेत. काही वर्षांपूर्वी कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी आदी तालुका शहरे असलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती झाल्या. पण, त्यांच्या इतकीच मोठ्या लोकसंख्येची गावे मात्र ग्रामपंचायतीच राहिली आहेत.

मालगावात सर्वात जास्त लोकसंख्या, तरीही..मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. गावठाणासह वाड्या-वस्त्या आणि सुभाषनगरच्या काही भागाचा बोजा ग्रामपंचायतीवर आहे. एखाद्या नगरपालिकेइतका बोजा ग्रामपंचायतीवर आहे. पण, तिचे रूपांतर नगर पंचायतीत होण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर उदासीनता आहे. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनीच विभाजनाचा निर्णय घेतला आहे. सुभाषनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत करून ताण कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे.

वाळवा तालुक्याचे ठिकाणी, तरीही ग्रामपंचायततालुक्याचे ठिकाण असलेले वाळवा गाव व्यापारी केंद्र आहे. शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करताना लोकसंख्येतही वाढ होत आहे. पंचक्रोशीतील डझनभर गावांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताण गावावर आहे. तरीही गावगाडा हाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवरच आहे. येथे नगर पंचायत करण्यात कोणालाही स्वारस्य नसावे अशी स्थिती आहे.

टॅग्स :Sangliसांगली