शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकले, सांगलीतील १५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 3:53 PM

जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले

सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीपरीक्षा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा पाचवीचा २८.१५ तर आठवीचा १६.९७ टक्के निकाल लागला.पाचवीचे १२ आणि आठवीचे ९ असे मिळून २१ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. ग्रामीण भागातील तब्बल १५ विद्यार्थी राज्य यादीत चमकले.शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेसाठी १८ हजार १२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १७ हजार २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पाचवीचा निकाल २८.१५ टक्के लागला असून, राज्याच्या गुणवत्ता यादीत १२ विद्यार्थी चमकले.सीबीएसई शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्यांनीही राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. याशिवाय जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सर्वाधिक मराठी माध्यमाच्या २४७ विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाचे १४, कन्नड माध्यम १०, मराठी-इंग्रजी माध्यमाच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १० हजार ७५३ जणांनी परीक्षा दिली होती.आठवीचा निकाल १६.९७ टक्के लागला असून, राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ९ विद्यार्थी चमकले आहेत. जिल्ह्यातील ४२३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील जिल्ह्यातील टॉप टेन विद्यार्थीपाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले दहा विद्यार्थी  : अग्रजा गणेश गुरव, शाहीद शब्बीर तांबोळी, श्रावणी सचिन सपकाळ, अमय अनिल जाधव, सुजल श्रीकांत कणसे, विश्वभारती विनायक पाटील, अभिजित भगवान जावडे, पार्थ चंद्रकांत पाटील, चिन्मय नामदेव गुरव.आठवी - निर्झरा अनिल गायकवाड, सार्थक महेश पाटील, आदित्य विजय खिलारी, श्रेणिक प्रताप शिंदे, अर्थव विजय खिलारी, अनिकेत शामराव शिंदे, स्वरा श्रीकांत अहंकरी, मधुरा प्रताप पाटील, आयुष्णी विजय जाधव, वैभव दादासाहेब खांडेकर.अग्रजा, शाहीद सहावीअग्रजा गणेश गुरव (९५.९७ टक्के, जि. प. शाळा, आरग, ता. मिरज), शाहीद शब्बीर तांबोळी (९५.९७ टक्के, जि. प. शाळा दहिवडी, ता. तासगाव) या दोन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा