शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अलमट्टी धरणातून त्वरित विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 24, 2023 18:17 IST

सांगली : सांगली , कोल्हा पूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र ...

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने तशा सूचना कर्नाटकला द्याव्यात, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सध्या अलमट्टी धरणात एक लाख १४ हजार ४०० क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून केवळ ६७०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, असेही समितीने निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले की, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगलीत कृष्णा नदीत पाणी पातळी १७ फुटांवर गेली आहे. कोल्हापुरात पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. कृष्णा, वारणा नद्यांचीही तीच परिस्थिती असल्यामुळे आलमट्टी धरणातून किमान एक लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्याच्या सूचना कर्नाटकला द्याव्यात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सचिव स्तरावरील बैठक झाली नाही, ती तत्काळ घेण्याची गरज आहे. निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, विजयकुमार दिवाण, धनाजी चुडमुंगे आदींनी निवेदन पाठवले आहे.पूर रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करा : पाटीलपूर येऊच नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करण्याची गरज आहे. सूचनांचे पालन न करता धरणातील पाणीसाठा केला जात आहे. पुन्हा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास नदीत विसर्ग वाढविला जाईल. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सर्जेराव पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर