शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

कडेगाव तालुक्यातील १७ गावांवर अन्याय

By admin | Published: April 11, 2016 11:19 PM

शासनाचे दुर्लक्ष : दुष्काळग्रस्त यादीत समावेश नाही

प्रताप महाडिक -- कडेगाव -तालुक्यातील १७ गावांचा समावेश अद्याप दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झालेला नाही. या गावांची खरीप हंगामातील पीक उत्पादनाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्तांच्या सर्व निकषास पात्र असतानाही या गावांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी करत आहेत.कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव, पाडळी, आसद, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे, रामापूर, कुंभारगाव, शिरगाव, अंबक, चिंचणी या १२ गावांसह वांगी, शेळकबाव, हिंगणगाव (खुर्द), शिवणी, वडियेरायबाग ही गाव दुष्काळग्रस्त यादीत अद्यापही समाविष्ट झालेली नाहीत. कडेगाव तालुक्यातील उर्वरित ३९ गावांना शासनाने टंचाईग्रस्त घोषित करून ८ कोटींची मदत दिली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु वंचित राहिलेली १७ गावे मात्र शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. येथे खरीप नंतर रब्बी हंगामही वाया गेला. ताकारी योजनेचे पाणी येथे मिळत असले, तरी अद्यापही हजारो हेक्टर शेती योजनेच्या कालव्यापेक्षा उंच भागात आहे. यामुळे ही शेती योजनेच्या लाभापासूनही वंचित आहे. सध्या या १७ गावातील बहुतांशी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कडेगाव तहसीलदार कार्यालयाकडून खरीप हंगामामध्ये ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांची अंदाजित यादी शासनाकडे हंगामाच्या मध्यावधीच्या दरम्यान दिली होती. यामध्ये या १७ गावांचा समावेश नव्हता. परंतु हंगाम संपल्यावर या गावांची खरीप पीक उत्पादन पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राजकीय नेते लक्ष घालणार?आमदार डॉ. पतंगराव कदम तसेच सत्ताधारी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या दोन्ही नेत्यांनी लक्ष घालून या गावांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी या १७ गावांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी कडेगाव तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभा करून या गावांवरील अन्यायाचा निषेध केला आहे.चिंचणीत कमी पाऊसकडेगाव तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद चिंचणी या भागात झाली आहे. तरीही हे गाव दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट नाही. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गावातील खरीप, रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत.