शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

कृष्णा नदी अखंडित वाहती ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

By अशोक डोंबाळे | Published: March 15, 2024 3:58 PM

कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

सांगली : कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. कोयना धरणात मुबलक पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडी पडण्याचे कारण काय, असा सवालही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. यापुढे कृष्णा नदी अखंडित वाहती राहिली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना, वारणासह सर्व धरणांमध्ये वीजनिर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी ठेवूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे. वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे. पण, सांगली जिल्ह्याच्या वाट्यातील ४७.५ टीएमसी पाण्याचा पूर्ण वापर केला नाही. सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ते सर्व पाणी वापरल्यानंतर जादा १२ टीएमसी पाणी मिळणार आहे. कुठेही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.पाण्यासाठी नागरिकांचे हाल

जलसंपदा विभाग कोयना, वारणा आदी धरणांतून वीजनिर्मितीचे कारण पुढे करून पुरेसे पाणी नदीत सोडत नाहीत. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील सर्व रब्बी पिके धोक्यात आली आहेत. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही अधिकारी पाणी व्यवस्थापन गांभीर्याने करत नाहीत. सातारा जिल्ह्यातील नेते पाण्याचे राजकारण करत आहेत, असा आरोप पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण यांनी केला.