शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

शेतकऱ्यांना भूमिहीन करून 'शक्तिपीठ'मधून ठेकेदारांचे हित, काँग्रेस नेत्यांचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Published: June 21, 2024 4:11 PM

शक्तिपीठ महामार्गबाधित कृती समितीच्या लढ्यास काँग्रेसचा पाठींबा

सांगली : राज्यातील १२ हजार ५८९ शेतकऱ्यांना भूमिहीन करून केवळ काही ठेकेदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माथी शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. या शक्तिपीठास आमचा तीव्र विरोध असून, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या लढ्यास काँग्रेसचा पाठिंबा आहे. सर्व आंदोलनात काँग्रेस सक्रिय असणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रा. सिकंदर जमादार, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे आदी उपस्थित होते.प्रतीक पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नसताना राज्यातील १२ हजार ५८९ शेतकऱ्यांची २७ एकर जमीन जाणार आहे. या शेतकऱ्यांना भूमिहीन करून सरकारला केवळ ठेकेदारांचेच हित साधायचे आहे का? जमिनीच संपल्या तर कोट्यवधी जनतेचे पोट कसे भरणार, असा सवालही त्यांनी केला.पृथ्वीराज पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील एक हजार ४०० एकर जमीन संपादित करून पाच हजार ३७० शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे. नुकतेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग कामाला स्थगिती दिल्याचे जाहीर केली आहे. पण, शेतकऱ्यांना स्थगिती नको तर महामार्गच रद्द करा, अशी काँग्रेसची मागणी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. शक्तिपीठ महामार्ग शक्तिपीठविरोधी कृती समितीसोबत काँग्रेस आंदोलनात उतरणार आहे.

अधिकारी कार्यालयास घेराव घालणार : पाटीलकाँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाची ताकद आणखी वाढणार आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, या मागणीसाठी आज, शनिवारी काँग्रेसकडून जिल्हा नियोजन समिती सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाणार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही काँग्रेस नेत्यांनी केले आहे.

अधिवेशनात आवाज उठविणारशक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्दचा मुद्दा अधिवेशनात मांडणार आहे, असे आश्वासन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गcongressकाँग्रेस