शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

महापालिका वीज बिल घोटाळ्याची पंधरा दिवसांत एसआयटीमार्फत चौकशी

By शीतल पाटील | Updated: July 19, 2023 21:06 IST

उदय सामंत यांची विधान परिषदेत ग्वाही : २०१० पासून बिलांचे थर्ड पार्टी ऑडिट

सांगली : महापालिकेच्या वीज बिलांमध्ये घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटी नेमण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये एसआयटीची स्थापना करून चौकशीस सुरुवात करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, २०१० पासूनच्या वीज बिलांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्याबाबत विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या पथदिव्यांच्या बिलांचे २०१५ पासूनचे लेखापरीक्षण केल्यानंतर ३ कोटी ९७ लाख रुपयांचा घोटाळा समोर आला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली? २०१० पासूनच्या बिलांचे ऑडिट केले जाणार आहे का? लोकायुक्तांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी सुरू झाली आहे का? त्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे का? असे प्रश्न पडळकर यांनी सभागृहात उपस्थित केले.

त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सांगली महापालिकेत वीज बिलांमध्ये घोटाळा झाला आहे. महावितरणने वीज बिल वसुलीसाठी ज्ञानेश्वर पाटील या खासगी व्यक्तीची नियुक्ती केली होती. त्याने महापालिकेच्या धनादेशामधून काही संस्था, खासगी व्यक्ती आणि सांगली शहर पोलिस ठाण्याचे वीज बिल भरले आहे. पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या कारागृहात आहे. महापालिकेच्या ११ कर्मचारी व दोन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. लोकायुक्तांनी घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांमध्ये चौकशीस सुरुवात होईल.

काँग्रेसचे सतेज पाटील यांनी लोकायुक्तांनी दोनवेळा आदेश देऊनही आजपर्यंत एसआयटी का नियुक्त केली नाही, असा सवाल केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार काय? २०१० पासूनच्या वीज बिलांचे लेखापरीक्षण होणार का? असे सवाल केले. त्यावर मंत्री सामंत यांनी थर्ड पार्टी ऑडिटचे आदेश दिले.

लागेबांधे तपासा : नीलम गोऱ्हेमहावितरणच्या कर्मचाऱ्याने खासगी व्यक्ती, संस्थांची वीज बिले महापालिकेच्या धनादेशातून भरली आहेत. या ग्राहकांचे कर्मचारी, अधिकाऱ्यांशी काही लागेबांधे आहेत का याचाही तपास करावा, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला. याबाबत एसआयटीला सूचित केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीUday Samantउदय सामंत