शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
3
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
4
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
5
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
6
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
7
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
8
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
9
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
10
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
11
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
12
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
14
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
15
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
16
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
17
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
18
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
19
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
20
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

इस्लामपूरचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती विकासाची कोल्हेकुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 11:33 PM

विजय कुंभार : सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांचा नुसता फार्स

इस्लामपूर : इस्लामपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादीने २०१६-१७ चा सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे विकास कामाची कोल्हेकुई आहे. सभागृहात सादर केलेला १०७ कोटींचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. झालेला विकास आणि आगामी काळात होणारी विकासकामे याचा सत्ताधाऱ्यांनी नुसता फार्स केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला.विजय कुंभार म्हणाले की, १९८५ पासून सत्ताधाऱ्यांनी फक्त कुसूमगंध बगीचा, राजारामबापू नाट्यगृह, बंद पडलेला पोहण्याचा तलाव, उद्ध्वस्त केलेले अंबिका उद्यान, तेथून गायब झालेली मिनी रेल्वे, तोट्यातील क्लब हाऊस, कोट तलावातील बोटिंग क्लब, निकृष्ट दर्जाची घरकुल योजना, गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला गांडूळ खत प्रकल्प ही विकासकामे केली आहेत. यातील बहुतांशी प्रकल्प बंद आहेत. यावर कोट्यवधी रुपये केलेला खर्च पाण्यात गेला आहे.सत्ताधारी सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर चर्चा न करता वाय-फायवर हाय-फाय चर्चा करतात. कोणतीही करवाढ केली नाही, असा डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी दुसरीकडे मात्र नवीन मालमत्ताधारकांवर प्रचंड करवाढ लादली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना कागदावरच राहिली असल्याचे अर्थसंकल्पात दिसते. शहराची एकूण पाणीपट्टी २ कोटी ८ लाख रुपये भरली जाते. एकूण पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च १ कोटी ३६ लाख असून, पालिकेस ७२ लाख नफा होतो. मुंबईसारख्या मेट्रो शहरातही घरगुती एक हजार लिटर पाण्यासाठी ४.५० पैसे दर आहे. (वार्ताहर)नागरिकांमध्ये नाराजीपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर अर्थसंकल्प फुगवला आहे. त्यामध्ये भुयारी गटारी ३० कोटी, घरकुल ११ कोटी अशा ४१ कोटी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. तसेच इस्लामपूर शहरातील रस्ते प्रकल्पासाठी शासनाने २४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत. ते २ वर्षे बँकेत ठेवल्याने त्याचे ५ कोटींचे व्याज पालिकेने घेतले आहे. परंतु शहरातील रस्ते आणि भुयारी गटार योजना हे केवळ दिवास्वप्नच ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.