शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

हेलपाटे मारून शेतकरी दमले, ‘सन्मान’ दूरच, पदरी निराशाच

By अविनाश कोळी | Published: January 06, 2023 6:13 PM

सांगली जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी

अविनाश कोळीसांगली : शेतकरी सन्मान योजनेत सन्मान मिळणे तर दूरच साधी माहितीही व्यवस्थित मिळत नसल्याने लाभार्थींच्या पदरी निराशा येत आहे. अर्जातील त्रुटी दूर करुन पेन्शन पूर्ववत करण्यासाठी हजारो शेतकरी सध्या महसूल व कृषी विभागाचे उंबरठे झिजवून थकले आहेत. योजनेची जबाबदारी नेमकी आहे तरी कुणाची, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी सन्मान योजनेतील गोंधळ गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागाकडे सुरुवातीला याचा डाटा होता. शासनाने कृषी विभागाकडे ही योजना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात योजना अद्याप हस्तांतरित झाली नाही. तरीही दोन्ही विभागात यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाण्यास सांगतात, तर कृषी विभागाकडून महसूल विभागाकडे बोट दाखविले जाते. यात शेतकरी फसला आहे.अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन केवायसी करण्यास जमत नसल्यामुळे त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेच विशेष मोहीम घेऊन अपूर्ण केवायसी पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याचा धोका आहे.४,३६,६४५ लाभार्थींची जिल्ह्यात नोंदजिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी म्हणून नोंद आहेत. १३ व्या हप्त्यासाठी केवायसी पूर्ण असलेल्या लाभार्थींची संख्या ३ लाख २० हजार ४३१ इतकी आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी