शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:57 IST

इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देहाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीतआगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.जयंत पाटील यांनी इस्लामपूर, आष्टा या शहरांच्या विकासाला गती दिली. ग्रामीण भागातील विकासाला निधी कमी पडू दिला नाही. त्याचबरोबर राजारामबापू उद्योग समूहातील संस्था सक्षम केल्या. या ठिकाणी नोकऱ्या देताना सर्वसामान्य बेरोजगारांचा विचार केला नाही. ज्याचा इस्लामपूर मतदारसंघाशी काहीही संबंध नाही, अशांना अधिकारी पदावर संधी दिली. या अधिकाऱ्यांनी आर्थिक स्वार्थ साधला.

याचाही परिणाम झाल्याचे दिसत आहे.गेल्या चार वर्षात भाजपच्या धोरणांविरोधात जयंत पाटील यांनी आंदोलने केली. इस्लामपूर शहरात आंदोलनावेळी हाय प्रोफाईल पदाधिकारी, कार्यकर्ते आलिशान वाहनांतून येऊन तोंडओळख परेड करण्यापलीकडे त्यांची कार्यपद्धती कधी पुढे सरकली नाही. तसेच काही नेते मतदार संघात आमदार पाटील यांच्या दौऱ्यावेळीच दिसतात. या नेत्यांना त्यांच्या गावातही जनमत नाही. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांची फळी आ. पाटील यांच्यापासून दुरावत चालली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात पक्ष बांधणीसाठी संपर्क वाढविला आहे. त्याचबरोबर इस्लामपूर मतदार संघावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. गावा-गावातील बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी बैठका घेण्यावरही आ. पाटील यांनी भर दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना वाळवा-शिराळ्यात मताधिक्य मिळाले. जोपर्यंत जयंत पाटील यांच्याजवळचे हाय प्रोफाईल कार्यकर्ते जनमानसात मिसळत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीची ताकद वाढणार नाही, हे मात्र स्पष्टपणे दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली