शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जयंत पाटील यांचा डाव- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 8:01 PM

उद्या सांगलीत मोर्चा

सांगली: राज्यातील २७ जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा डाव आहे. जलसंपदा खाते त्यांच्याकडे असल्यामुळे तेच या घोटाळ्यास जबाबदार आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. विजेचे खासगीकरण, एकरकमी एफआरपीसाठी दि. १८ रोजी शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले की, महानिर्मितीच्या जलविद्युत प्रकल्पातून प्रतियुनिट एक रुपयाला वीज तयार होते. याउलट सध्या महावितरण कंपनी खासगी कंपन्यांकडून पाच ते सहा रुपये युनिटने वीज खरेदी करते. सरकारी कंपनीच्या पाचपटीने जादा दराने खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी सुरू आहे.

जलविद्युत प्रकल्पांना ३५ वर्षे झाल्याचे कारण देऊन राज्यातील २७ प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री पाटील यांचा डाव आहे. या प्रकल्पांच्या खासगीकरणात मोठा घोटाळा आहे. या प्रश्नावर संघटना राज्यभर आवाज उठविणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एकाही जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज घोटाळ्यातील बोक्यांना ‘करंट’ दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे; पण सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३०० कोटी रुपये एफआरपी थकीत आहेत. साखर उद्योगाला सध्या सुगीचे दिवस आहेत. एकरकमी एफआरपी देऊनही त्यांच्याकडे क्विंटलला २०० ते ३०० रुपये राहतात, तरीही कारखानदार एकरकमी एफआरपी देत नाहीत. विजेचे खासगीकरण, एकरकमी एफआरपीसाठी दि. १८ रोजी शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत.

आंदोलकांच्या मागण्या-

  • वजनातील काटामारी थांबवा
  • द्राक्षपीक विमा योजना सक्षम करा
  • द्राक्षबागांना आवरण कागदासाठी अनुदान द्या
  • रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ मागे घ्या
  • वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसा वीज द्या
  • भूमी अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करानियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान द्या
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmahavitaranमहावितरणJayant Patilजयंत पाटील