शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जयंतराव-पवारांचा सामना

By admin | Published: June 02, 2017 11:29 PM

जयंतराव-पवारांचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार गट आमने-सामने येणार आहेत. दोन्ही गटाकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून एकेकाळचे कट्टर समर्थक आता विरोधक बनले आहेत. सध्या हा कारखाना राजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात आहे. याबाबत न्यायालयीन दावेही सुरू आहेत. त्यातच सर्वोदय कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना गती आली आहे. कारखान्याच्या मतदार यादीवरूनही दोन्ही गटात वाद झाला होता. पण त्याचा निकाल लागताच निवडणुकीचे वेध लागले होते. आष्टा, नरवाड, हरिपूर, बावची, तुंग या गटात कारखान्याचे सभासद विखुरलेले आहेत. पूर्वी कारखाना कार्यक्षेत्रातील आणि मिरज पश्चिम भागातील गावे संभाजी पवार यांच्या मतदार संघात होती. आता ती जयंतरावांच्या मतदार संघात आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकत्र आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा पवार गटाचा प्रयत्न राहील. पवार गटाची धुरा अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यावर आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वीच गटनिहाय बैठका व सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यातून लवकरच उमेदवारांची यादीही तयार केली जाणार आहे. कारखान्याची मालकी सभासदांच्या हाती राहावी, या मुद्द्यावर पवार यांनी जोर दिला आहे. दुसरीकडे कार्यक्षेत्रात जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. आष्टा, बावची, तुंग, समडोळी या परिसरात जयंतरावांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्या जोरावर या निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी चालविली आहे. पण अद्यापपर्यंत जयंत पाटील यांच्याकडून कोणताच आदेश आलेला नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ६ जून आहे. त्यात रविवार वगळता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहतो. त्यामुळे सोमवार व मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. विलासराव शिंदे गटाची भूमिका महत्त्वाचीआष्टा परिसरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार विलासराव शिंदे यांचे वर्चस्व आहे. सध्या शिंदे गट जयंतरावांवर नाराज आहे. त्यांचे चिरंजीव वैभव यांनी नुकताच भाजपप्रवेश केला आहे. त्यामुळे उट्टे काढण्याची खेळी शिंदे गटाकडून होऊ शकते. शिवाय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भूमिकाही या परिसरात निर्णायक आहे. त्यामुळे या जयंतराव विरोधकांकडून संभाजी पवार गटाला बळ मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. सात अर्जांची विक्रीसर्वोदय साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली. दिवसभरात दोन्ही गटाकडून सात अर्ज नेण्यात आले आहेत. सर्वसाधारण गटासाठी एक हजार, तर इतर गटासाठी तीनशे रुपये अनामत आहे.