शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:57 IST

कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शिरोळ तालुका सीमेवर कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने महाराष्ट्रातील  कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी आहे.

ठळक मुद्देसीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल

मिरज : कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शिरोळ तालुका सीमेवर कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने महाराष्ट्रातील  कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी आहे.गतवर्षी कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात आले होते. त्याप्रमाणे यावर्षीही कोयनेतून पाणी सोडण्याची कर्नाटक जलसंपदा विभागाची मागणी आहे. मात्र कर्नाटकला पाणी दिल्यानंतर कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून जत परिसरात देण्याच्या अटीमुळे पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने अथणी व कागवाड तालुक्यात नदीकाठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात तीव्र पाणीटंचाई आहे.

कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. अथणी व कागवाड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक व शेतकरी आंदोलन करीत आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र पाणी सोडण्यात आले नसल्याने गोकाकजवळ असलेल्या मलप्रभा नदीवरील हिडकल धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

धरणातून कालव्याद्वारे रायबाग, ऐनापूर येथून कुडचीजवळ कृष्णा नदीत सोमवारपासून दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे २३ मेनंतर कोयनेतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली