शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

By admin | Published: July 12, 2017 12:05 AM

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ९१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे ७९ लघु प्रकल्पात तीन टक्के, तर पाच मध्यम प्रकल्पांत केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके जगविणे हे आव्हान ठरणार आहे.जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत भिन्न आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भाग आणि कडेगाव तालुक्यातील बहुतांशी खरीप पेरण्या मान्सून पावसावर होतात. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाल्यास ८५ टक्के पिके वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील खरीप पेरण्या वाया जाण्याचा धोका कमी आहे. परंतु, यासाठी नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा असण्याची गरज आहे. उर्वरित १५ टक्के पेरण्या केवळ पावसावरच अवलंबून आहेत. येथील पिके सध्या अडचणीत आहेत. जिल्ह्याचा सर्वाधिक मोठा भाग दुष्काळी पट्ट्यात येत आहे. यामध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व आणि कडेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश होत आहे. या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस काहीप्रमाणात झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६१ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. बाजरी, ज्वारीची ८२.२ टक्के झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात उडिदाची ९२ टक्के, तर मूग आणि तुरीची ३८ टक्के पेरणी झाली आहे. येथील पिके अर्धा ते एक फूट वाढून कोमेजली आहेत. माळरानावरील पिकांनी तर मानाच टाकल्या असून, दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर येथे दुबार पेरणीच करावी लागणार आहे. पलूस, वाळवा, खानापूर, शिराळा, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भागामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे केवळ २९.६ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. जोराचा पाऊस झाल्याशिवाय येथील पेरण्या होणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही सध्या चुकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ..तरच पिके वाचू शकतील : राजेंद्र साबळेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पाऊस कमी आहे. पण, येत्या चार दिवसांत पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिके वाचण्यास मदत होईल. पाऊस झालाच नाही, तर खरीप हंगामातील दुष्काळी भागातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. चार दिवस वाट पाहून जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचा सद्य:स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.जिल्ह्यात आजअखेर झालेली पेरणीपीकपेरणी झालेले क्षेत्रभात१४७४० हेक्टरज्वारी२७०१० हेक्टरबाजरी३५०७४ हेक्टरमका१४६२४ हेक्टरतूर२८८७ हेक्टरमूग२९१९ हेक्टरउडीद७२३९ हेक्टरभुईमूग१२९५६ हेक्टरसोयाबीन२६३९७ हेक्टरजिल्ह्यातील पाऊस मि.मी.तालुका११ जुलै १७११ जुलै १६मिरज६३.८ २५७.२ जत१३९.२११९.२खानापूर७५.३१२४.५वाळवा१०३.६२५३.४तासगाव५२.५१६९.७शिराळा२४१.९५३०.२आटपाडी१४३.५१३६.२क़महांकाळ१२३.६२४२.१पलूस६५.२२०५.१कडेगाव६६.८१९३.२एकूण१०८.५२२०.३