शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर कृष्णाकाठी पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:54 IST

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत ...

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत असल्याने नदी काठावर पाणीचपाणी पहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी ही केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यात व राज्याच्या अनेक भागांत टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.  उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहीरी, ओढे, कॅनाल ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण व भटकंती करावी लागत आहे. माणसा बरोबर जनावरांच्या ही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे.काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागली आहेत. अशा भीषण परिस्थितीत उद्भवली असताना कृष्णा नदी काठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याच प्रकारची झळ बसताना दिसत नाही. हि बाब कृष्णा नदी काठावरील नागरिकांनी भाग्यशाली ठरत आहे. कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदी काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, ताकारी, बहे, तांबवे नरसिंहपूर, वाळवा, भिलवडी पर्यंतच्या भागात पाणीच पाणी आहे.

कृष्णाकाठावरील मुबलक पाण्यामुळे नदीकाठावरील जनता स्वत:लागली भाग्यशाली समजत आहे. अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा विनियोग व पाण्याची नासाडी चालल्याचे चित्र ही कृष्णा काठावर पाह्यला मिळत आहे. नागरिकांनी  पाणी टंचाई भागाची परिस्थिती डोळ्या समोर आणावी व पाण्याचा गैरवापर व नासाडी थांबवावी. - भागवत जाधव, अध्यक्ष वाळवा तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळriverनदीWaterपाणी