शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर कृष्णाकाठी पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 5:52 PM

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत ...

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत असल्याने नदी काठावर पाणीचपाणी पहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी ही केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यात व राज्याच्या अनेक भागांत टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.  उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहीरी, ओढे, कॅनाल ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण व भटकंती करावी लागत आहे. माणसा बरोबर जनावरांच्या ही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे.काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागली आहेत. अशा भीषण परिस्थितीत उद्भवली असताना कृष्णा नदी काठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याच प्रकारची झळ बसताना दिसत नाही. हि बाब कृष्णा नदी काठावरील नागरिकांनी भाग्यशाली ठरत आहे. कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदी काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, ताकारी, बहे, तांबवे नरसिंहपूर, वाळवा, भिलवडी पर्यंतच्या भागात पाणीच पाणी आहे.

कृष्णाकाठावरील मुबलक पाण्यामुळे नदीकाठावरील जनता स्वत:लागली भाग्यशाली समजत आहे. अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा विनियोग व पाण्याची नासाडी चालल्याचे चित्र ही कृष्णा काठावर पाह्यला मिळत आहे. नागरिकांनी  पाणी टंचाई भागाची परिस्थिती डोळ्या समोर आणावी व पाण्याचा गैरवापर व नासाडी थांबवावी. - भागवत जाधव, अध्यक्ष वाळवा तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळriverनदीWaterपाणी