शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मानवी चुकांमुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये - पृथ्वीराज पवार 

By अशोक डोंबाळे | Published: June 10, 2024 5:03 PM

धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे; जलसंपदामंत्र्यांची भेट घेणार

सांगली : कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये, किमान मानवी चुकांमुळे सांगली बुडू नये, असे जलसंपदा विभागाने नियोजन करणे गरजेचे आहे. धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे केली.पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांची पृथ्वीराज पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, धरणातील पाणीसाठा किती असावा, याविषयी नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येते. २०२१ च्या महापुरात हा तक्ता पाळला गेला नाही, असे चित्र समोर आले होते. दर पाच वर्षांनी कोयना धरणातील पाणीसाठ्याचा तक्ता ठरवला जातो. त्यानुसार पाणी नियोजन केले जाते. पण, सद्य:स्थितीचा अभ्यास करुन धरणातील पाणीसाठा आणि पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. कोयना धरणात कोणत्या काळात किती पाणी असावे, हा महापूर काळातील वादाचा आणि कळीचा मुद्दा ठरला होता. २०२१ ला ज्या चुका झाल्या, त्या मानवी होत्या. सगळे दिसत असताना नियोजन चुकले होते. आता पुन्हा तसे व्हायचे नसेल तर जुन्या चुका टाळाव्या लागतील. नियमात आवश्यक ते बदल करावे लागतील. त्यासाठी जलसंपदामंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हा बदल या वर्षीपासूनच अंमलात आला तर बरे होईल.

कारण, गतवर्षी दुष्काळी स्थिती होती. यंदा सरासरीहून १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत पूरप्रश्नावरील अभ्यासकांशीही चर्चा करणार आहे. यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, सचिन घेवारे, शिवाजी लोंढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर