शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

चिंचणीच्या ओसाड माळरानात कृष्णामाईचे आगमन, टेंभू योजनेच्या माध्यमातून हरितक्रांतीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 2:20 PM

चिंचणी (मंगरूळ) परिसरात असलेल्या ओसाड व उजाड माळरानात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार

विटा : खानापूर तालुक्यातील चिंचणी (मंगरूळ) परिसरात असलेल्या ओसाड व उजाड माळरानात आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नांतून व टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाईचे आगमन झाले आहे. या परिसरात आता हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

टेंभू योजनेच्या प्रकल्पांतर्गत लघुवितरिका क्र. ३ मधून चिंचणी (मं.) येथील ओढापात्रात पाणी सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बबन पाटील, अशोक निकम उपस्थित होते.

सुहास बाबर म्हणाले की, चिंचणी येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याची चातक पक्षाप्रमाणे प्रतीक्षा करीत होते. आता चिंचणीच्या ओढा पात्रात सोडलेले टेंभूचे पाणी पाहून समाधान लाभत आहे. सगळ्या विकासकामांपेक्षा पाण्याचे काम किती महत्त्वाचे आहे, याची आता जाणीव होत आहे. चिंचणी ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही येत्या दोन ते तीन महिन्यांत मार्गी लागेल.

या कार्यक्रमास सुबराव निकम, शहाजी निकम, आनंदराव निकम, सचिन पाटील, धनाजी निकम, सचिन निकम, रामेश्वर सुर्वे, सुरेश सुर्वे, शशिकांत माने, बाबू पवार, भगवान पवार, गणपतराव शिंदे, आनंदा माने, डॉ. नामदेव माने, परशराम निकम, शिवाजी निकम, उत्तम निकम, नवनाथ भगत, उत्तमराव पाटील, भगवान शिंदे, महादेव निकम, शिवाजी वारकरी, सुनील निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली