शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

लातूर पाणीप्रश्नावर सकारात्मकतेचा सूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2016 12:17 AM

भाजप आक्रमक : राष्ट्रवादी, कॉँग्रेस नेत्यांकडूनही समर्थनाच्या भूमिकेमुळे विरोध करणारे एकाकी

सांगली : मिरजेतून लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाला विरोध करणारे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आता पक्षाच्या अधिकृत सकारात्मक भूमिकेमुळे एकाकी पडले आहेत. कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अण्णा डांगे यांनी लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याने आता सर्वच पक्ष, संघटना एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांची अवस्था लातूरपेक्षा भयानक असल्याने लातूरला मिरजेतून पाणी नेणारी रेल्वे रोखण्याचा इशारा काँग्रेस नेते सिध्दार्थ जाधव व अनिल आमटवणे यांनी बुधवारी दिला होता. राष्ट्रवादी शहराध्यक्ष साजीद पठाण व नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांनीही यास विरोध केल्याने लातूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत होती, मात्र पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लातूरला पाणीपुरवठ्याच्या निर्णयास समर्थन दर्शविल्यामुळे स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे. जिल्ह्यातील दुष्काळाकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेले दुर्लक्ष कॉँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना अजूनही खटकले आहे. तरीही लातूरबाबत आता सर्वपक्षीय सकारात्मकतेचे चित्र निर्माण झाले आहे. रेल्वे अडवणे हे राष्ट्रवादीचे धोरण नाही : अण्णा डांगेसांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त असून अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे, असे असताना मिरजेहून लातूरच्या जनतेसाठी रेल्वेने पाणी नेणे यास आमचा विरोध आहे, अशी माहिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली. डांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाण्याची रेल्वे अडविण्याच्या मैनुद्दीन बागवान यांच्या विचाराशी आम्ही सहमत नाही. दुष्काळग्रस्तांना शक्य तितकी मदत काही जोखीम पत्करून करण्याची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आहे. त्यांच्या विचाराला विसंगत अशी भूमिका बागवान घेत आहेत, हे योग्य नाही. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा मैनुद्दीन बागवान यांनी दौरा करावा. त्यांच्यासाठी तीव्र अंदोलन उभे करावे, त्यात आम्हीही सहभागी होवू. रेल्वेला भाजप कार्यकर्ते संरक्षण देणारमिरज : लातूरला पाणी न देण्याची दर्पोक्ती करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा भाजपने निषेध केला आहे. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला भाजप कार्यकर्ते संरक्षण देऊन पाणी पाठवतील, असे भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार शुक्ल यांनी निवेदनात म्हटले आहे. दुष्काळग्रस्तांशी काही देणे-घेणे नसल्याने केवळ राजकारण करायचे आहे. सत्तेत असताना पाणी दिले नाही आणि आता सत्तेत नसतानाही पाणी अडविण्याच्या भूमिकेमुळे जनतेला त्यांचा पाण्याबाबतच कळवळा कळला. पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेण्यापूर्वी लातूरच्या काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा करा. लातूरला जाऊन पाणी टंचाईची भीषण परिस्थिती त्यांनी पाहिल्यास विरोधाची हिंमत होणार नाही.