शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

By संतोष भिसे | Published: April 12, 2024 6:44 PM

ताकारी, म्हैसाळ, टेंभूमधून डझनभर आमदार 

संतोष भिसेसांगली : ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेती फुलली आहेच, शिवाय राजकारण्यांनीही प्रत्येक निवडणुकीत या योजनांचे भांडवल करीत मतांची भरघोस पिके घेतली आहेत. आजवर या योजनांमधून डझनभर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे पीक आले आहे. सध्या ३५ वर्षांनंतरही प्रत्येक निवडणुकीत या योजनांच्या पाण्याची साखरपेरणी सुरूच आहे.

जिल्ह्यातील सिंचन योजना म्हणजे राजकारण्यांसाठी निवडणुकीतील प्रचाराचा हमखास मुद्दा ठरत आला आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असा बोलघेवडेपणा नेत्यांकडून केला जात असला, तरी सिंचन योजनांबाबतीत मात्र २० टक्केच समाजकारण आणि बाकीचे राजकारण असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच आज सुमारे ४० वर्षे होत आली तरी, म्हैसाळ योजना १०० टक्के पूर्ण होऊ शकली नाही. नेत्यांनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. योजना पूर्ण होऊन शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे, यासाठी कुणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. आता सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही या योजनेचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी दिसत आहे. अगदी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही याच मुद्द्यावर रान तापलेले दिसणार आहे.कवठेमहांकाळ, मिरज, जत, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी या टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी सिंचन योजनांचा मोठा आधार आहे. त्यांच्या पाण्यावरच अनेकदा निवडणुकीचे पारडे फिरल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच डॉ. पतंगराव कदम यांच्यापासून आर. आर. पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यासाठी या योजना जिव्हाळ्याच्या राहिल्या आहेत. अगदी अलीकडे विटा - खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनीही टेंभू, आरफळसाठी सातत्याने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळाले आहे.मिरज - कवठेमहांकाळचे तत्कालीन आमदार अजितराव घोरपडे यांनी म्हैसाळ योजनेच्या जोरावरच आमदारकीला आणि राज्यमंत्रिपदालाही गवसणी घातली होती. त्यांच्यापूर्वी शिवाजीराव शेंडगे यांनीही योजनेच्या आधारे मंत्रिपद मिळविले होते. जतला उमाजीराव सनमडीकर, मधुकर कांबळे, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप, विक्रम सावंत, तासगावला सुमनताई पाटील, विटा - खानापूरला सदाशिवराव पाटील, मिरजेला सुरेश खाडे, आटपाडीला राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासाठीही पाणी योजना हा हमखास गुलाल उधळणारा विषय ठरला आहे.

जिल्ह्याचे नेतृत्वही पाण्यावरचजिल्ह्याचे नेतृत्व करायचे, तरी सध्या सिंचन योजनांचे नाणे खणखणीतपणे वाजवावे लागते. अर्थात, यातील राजकारण सोडले, तरी नेत्यांच्या कमी अधिक रेट्यामुळेच आज दुष्काळी भागात गंगा अवतरली आहे, हे मान्य करावे लागते. पतंगराव कदम, आर. आर. पाटील व जयंत पाटील यांनी म्हैसाळ योजना सतत प्रवाहीत ठेवून जिल्ह्याच्या पूर्व भागाला वेळोवेळी दिलासा दिला होता. हीच साखरपेरणी आता लोकसभा निवडणुकीतही सुरू आहे. जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी प्राणपणाने काम करू, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीPoliticsराजकारण