शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

विवाह समारंभात नेत्यांची रेलचेल

By admin | Published: May 03, 2016 11:25 PM

उपस्थितीसाठी कसरत : कार्यकर्त्यांची मर्जी राखण्याचा आटोकाट प्रयत्न

अशोक पाटील --इस्लामपूर -दि. ३० एप्रिल व १ मे या दोन दिवशी विवाह समारंभांनी रेकॉर्ड ब्रेक केले. या समारंभास हजेरी लावण्यासाठी वाळवा व शिराळा तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. आलेल्या निमंत्रण पत्रिकेची शहानिशा करुन, जवळचा आणि दूरचा कोण? याचा विचार करुनच बहुतांशी नेत्यांनी विवाह समारंभास उपस्थित राहणे पसंद केले. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तरीसुध्दा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा—शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यापासून ते गावातील सरपंच पदापर्यंत असणाऱ्या सर्वच नेतेमंडळींनी लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.वाळवा, शिराळ्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचा गट मोठा आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना आपल्या लग्नसमारंभास आणण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच आग्रह असतो. स्वत: जयंत पाटील यांनीही कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरातील लग्नसमारंभ चुकू नये, म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच उपस्थितीत लग्नसमारंभ पार पाडण्यासाठी काहींनी लग्नाची तारीख आणि मुहूर्ताच्या वेळेतही बदल केल्याची चर्चा आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी निमंत्रणपत्रिका देतानाच आपल्या वधू—वरांना सोबत घेऊन, त्यांच्याचहस्ते पत्रिका देऊन, तसेच त्यांचे आशीर्वाद घेऊन, काहीही झाले तरी लग्नाला उपस्थिती हवीच, असाही आग्रह केल्याचे समजते. जयंत पाटील यांनीही याची दखल घेत, ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवसातील लग्नसमारंभांना मॅरेथॉन भेटी देऊन रेकॉर्ड ब्रेक केले.वाळवा तालुक्यातीलच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. पाटील यांच्यासह राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांनाही, लग्नसमारंभास उपस्थिती लावताना तारेवरची कसरत करावी लागली.शिराळा तालुक्यातील नेत्यांचीही अवस्था अशीच आहे. येथे तीन गट सक्रिय असल्याने लग्नसमारंभास उपस्थिती लावण्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. माजी मंत्री, आमदार शिवाजीराव देशमुख यांची प्रकृती साथ देत नसली तरी, ते आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जमेल तेवढ्या लग्नसमारंभांना उपस्थित राहत आहेत. परंतु त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समारंभास न चुकता उपस्थित राहत आहेत. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे पूर्वीपासूनच प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहण्यात अग्रेसर आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. आ. नाईक यांनी जमेल तेवढ्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. जेथे स्वत: जाणे शक्य नाही, तेथे त्यांनी आपल्या घरातील जि. प. सदस्य रणधीर नाईक व इतरांना उपस्थिती लावण्याचे नियोजन केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनीही जास्तीत जास्त विवाह समारंभांना आवर्जून उपस्थिती लावत, आपणही काही कमी नाही, असेच दाखवून दिले आहे.वाहतुकीची कोंडी : मुहूर्त चुकले३० एप्रिल व १ मे या दोन दिवशी लग्नसमारंभाचे बरेच मुहूर्त होते. घरासमोरील मंडपामधून ते मोठ्या कार्यालयांत लग्नाची धामधूम सुरु होती. इस्लामपूर व शिराळा शहरातील मंगल कार्यालयांत असलेल्या विवाह समारंभांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती. या वाहनांच्या कोंडीमुळे अनेकांना विवाह मुहूर्त गाठणे जमले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा—शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यापासून ते गावातील सरपंच पदापर्यंत असणाऱ्या सर्वच नेत्यांनी लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.