शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

चहा सोडून बोला !

By admin | Published: June 02, 2017 11:20 PM

चहा सोडून बोला !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात परिणाम दिसून आला. संपाच्या भितीने हॉटेल मालकांनी दुधाचा साठा करून ठेवला होता. मात्र हा स्टॉकही संपल्याने ‘चहा सोडून बोला’ असे ऐकायला मिळत होते. संपापूर्वी हॉटेल मालकांनी दूध आणि इतर भाजीपाल्यांचा स्टॉक करून ठेवला होता. दोन दिवसांत संप मिटेल, अशी अशा बाळगून अनेकांनी मर्यादित साठा केला होता. दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने हॉटेलमालक चिंतेत आहेत. दूध आणि भाजीपाला रोजच्या रोज आणावा लागतो. मात्र भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्याने नास्टाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दुधाचे टँकर पोलिस बंदोबस्तात येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी अनेक हॉटेलमध्ये दुधाच्या पिशव्या शुक्रवारी पोहोचल्या नाहीत. संप आणखी दोन दिवस सुरू राहिला तर हॉटेलला टाळे लागण्याची शक्यता आहे.शेतकरी संपामुळे मार्केटयार्ड परिसरातील चित्र शुक्रवारी वेगळेच दिसले. ऐरवी सकाळी सहा वाजता या परिसरात शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची. मात्र शुक्रवारी एकही शेतकरी भाजी घेऊन आला नसल्याचे जाणवले. मार्केटयार्डला शुक्रवारी सुटी असते. यामुळे संपाचा आणखीनच परिणाम जाणवला. मात्र जो माल खराब होण्याची शक्यता आहे. असा माल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काही दलालांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मेथीची पेंडी दहा रुपयांना मिळत होती. ती आता काही ठिकाणी वीस रुपयांना विकली जात आहे. बहुतांश ठिकाणी मेथीची पेंडी संपल्याचे दिसून येत आहे. राजवाडा भाजी मंडईतही हीच स्थिती होती. काहींनी भाजी विक्री बंद करून फिरायला जाणे पसंत केले आहे. तुमचा संप.. आमची विश्रांती !सातारा मार्केटयार्डमध्ये नेहमी खांद्यावर बटाटे आणि कांद्यांची पोती घेऊन जाणारे हमाल शुक्रवारी वेगळ्याच विश्वात होते. शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे या हमालांना विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळाला. शुक्रवारी मार्केटयार्डला सुटी असली तरी हमालांकडून छोटी-मोठी कामे केली जातात. त्यामुळे काही हमाल सुटीच्या दिवशीही या ठिकाणी येत असतात. रोज कमाई झाली तरच एकवेळचे जेवण मिळणार, अशी परिस्थिती असलेल्या हमालांना हा संप लवकर मिठावा, असे वाटत आहे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा विश्रांती केलेली बरी, असे म्हणून अनेकांनी शुक्रवारचा दिवस विश्रांतीमध्ये घालविला.रिक्षा चालकाची बारा वाजता झाली भवानी!पहाटे सहा वाजता रिक्षाचालक मार्केटयार्डमध्ये रोज येत असतात. सकाळी तरकारीचे भाडे त्यांना मिळत असते. मात्र शेतकऱ्यांच्या संपामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत रिक्षा चालकाला भाडे मिळाले नव्हते. त्यानंतर त्याला एक भाजीविक्रेते गिऱ्हाईक आले. हा संप असाच सुरू राहिला तर आम्हाला रिक्षा या ठिकाणी उभ्या करणे परवडणार नाही. असे रिक्षाचालक समीर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.