शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 11:46 AM

नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना सर्वाधिक झळ बसणार

श्रीनिवास नागे

सांगली : आकाशवाणीच्या सांगलीसह प्रमुख सात केंद्रांवरील सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेतील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यास मंगळवारी प्रारंभ झाला. सव्वाचार तासांसाठी स्थानिक कार्यक्रम बंद करून ‘सांगली आकाशवाणी’चा आवाजच प्रसारभारतीने दाबला आहे. नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना याची सर्वाधिक झळ बसणार आहे.

‘एक राज्य, एक आकाशवाणी केंद्र’ असे धोरण प्रसारभारतीने स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील पुणे, सांगली, औरंगाबाद, परभणी, जळगाव, रत्नागिरी, नागपूर या प्रमुख केंद्रांवर सकाळी अकरा ते दुपारी सव्वातीन या वेळेत मुंबई केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रमच सहक्षेपित (रिले) होणार आहेत. तसे आदेश अतिरिक्त महानिदेशकांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

आकाशवाणी हे लोकरंजन आणि लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात आकाशवाणीची २८ जिल्हा केंद्रे आणि वाहिन्या (प्रायमरी चॅनेल्स) आहेत. त्यावरून स्थानिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण होते. स्थानिक घटना, समस्या, लोककला-संस्कृतीचा विचार करून या कार्यक्रमांची निर्मिती होते. त्यातून स्थानिक उद्घोषक-निवेदक आणि कलावंतांना संधी मिळते. संस्कृतीचे प्रादेशिक वैविध्यही जपले जाते.

पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारा मोठा श्रोतृवर्ग आहे. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण अधिक आहे. नाटिका, शेती, लोकशिक्षण आणि कामगारविषयक संवादिका, सामाजिक-कौटुंबिक श्रुतिका, अभिवाचन, बातम्या, संगीत-मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या ‘सांगली आकाशवाणी’ राज्यात अग्रेसर ठरली. आता प्रसारभारतीच्या धोरणामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सव्वाचार तास तास, तर नंतर टप्प्याटप्प्याने दिवसभरातील सर्वच स्थानिक कार्यक्रम बंद होतील.त्याऐवजी राज्यातील एकाच प्रमुख (मुंबई) केंद्रावरील कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याचा सर्वात मोठा फटका नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना बसणार आहे. नैमित्तिक उद्घोषकांना तीनऐवजी दोनच पाळ्यांमध्ये काम मिळेल. स्थानिक कलाकारांना संधी मिळणार नाही.

धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगलीसाठी आकाशवाणी केंद्र मंजूर करून आणले. ६ ऑक्टोबर १९६३ रोजी या केंद्रावरून प्रक्षेपण सुरू झाले. नाट्यपंढरीतील या केंद्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली. कल्पक अधिकारी, हरहुन्नरी स्थानिक कलावंत, आवाजावर हुकूमत असणारे उद्घोषक-निवेदक, कार्यक्रमांतील वैविध्य यामुळे सर्वदूर महती पोहोचली. मात्र प्रसारभारतीच्या धोरणातील विसंगती आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे सांगली केंद्राच्या सुस्पष्ट ‘आवाजा’ला खरखर लागली...

टॅग्स :Sangliसांगली