शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Lok Sabha Election 2019 भाजपकडून ‘वंचित’ आघाडीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:42 IST

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र ...

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे. धनगर समाजातील तरुणांनी या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरातील गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, बेरोजगारी, धनगर आरक्षण, यासंदर्भात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. परंतु मागील पाच वर्षात या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. यासंदर्भात ते काहीच बोलण्यास तयार नाहीत. याशिवाय परत सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहेत, तेही सांगण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. प्रचार सभांमधून विरोधकांची निंदानालस्ती व स्थानिक नेत्यांवर टीकाटिपणी करण्यातच ते धन्यता मानून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा कमी होत आहे, हे लक्षात आल्यानंतरच भाजपचे लोक देशातील नागरिकांच्या भावना भडकवित आहेत.आ. पाटील म्हणाले कू, विरोधी उमेदवार खासदार संजय पाटील व गोपीचंद पडळकर एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत. एकमेकांची निंदानालस्ती करत आहेत. परंतु आम्ही गोरगरिबांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. देशाचा विकास व कर्तव्यापलीकडे जाऊन राजकारण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाआघाडीच्या विशाल पाटील यांना मतदान करून विजयी करा.यावेळी माजी आमदार उमाजी सनमडीकर, रविकांत तुपकर, काँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांचीही भाषणे झाली.उत्तम चव्हाण, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, इकबाल गवंडी, कुंडलिक दुधाळ, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, शिवाजी शिंदे, नीलेश बामणे, आप्पासाहेब बिराजदार, रमेश पाटील, महादेव पाटील, मल्लेशी कत्ती, श्रीकांत शिंदे, महादेव कोळी, रमेश पाटील, सुजय शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक