शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Lok Sabha Election 2019 : जयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:22 AM

वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोलाजनता इतिहास नव्हे, सध्याचे कर्तृत्व पाहतेआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार

सांगली : वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.येडेमच्छिंद्र येथे राजू शेट्टी यांच्या प्रचार प्रारंभावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी, आता वसंतदादा व राजारामबापू गटातील वाद संपवून या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी दादा व बापू यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद झाले असतील. नंतर ते मिटलेही होते. दोघे एकत्र आले होते. आता इतिहासातील घटनांना महत्त्व देण्यात अर्थ नाही.सांगलीची जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसचा उमेदवार या जागेवर सातत्याने निवडून येत होता. त्यामुळे जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांतून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. खा. राजू शेट्टी यांनी जागावाटपावेळी सात मतदारसंघांची मागणी केली होती.

राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानीला दिला, तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडली. त्यात माझी भूमिका काय? खा. शेट्टी सांगलीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील. ते जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू. राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघ अदलाबदलीत काँग्रेसकडून मागितला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचार करणार का, असा प्रश्न करताच, राजकारणात जर-तरच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो. त्यात मला स्वारस्य नाही, असे म्हणत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दिलीपतात्या पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेबाबतही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.सतेज पाटील यांच्याशी चर्चाकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी भूमिका घेतली आहे. सतेज पाटील यांना आपण भेटलो आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अशी विनंती केली आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. पण या प्रश्नांशिवाय उठून काम करण्याची वेळ आली आहे. हातकणंगलेत आवाडे गटाचीही समजूत काढली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली