शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

साध्वींबद्दल भाजपाचे मौन का? - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:45 IST

साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. 

ठळक मुद्देसाध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सभा पार पडली.साध्वीच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचे छुपे मनसुबे स्पष्टपणे दिसत आहेत.  

सांगली - साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशात लोकशाही धोक्यात येत आहे. एकीकडे मोदी दहशतवाद संपविल्याचे सांगत असतानाच भाजपाकडून दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वीसारख्या लोकांना उमेदवारी दिली जाते. ज्या शहीद पोलिसांना अशोकचक्र दिले जाते त्यांच्याबद्दल अपशब्द काढून तमाम देशवासीयांचा अपमान साध्वी ठाकूर आणि भाजपाने केला आहे. साध्वीच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचे छुपे मनसुबे स्पष्टपणे दिसत आहेत. पाकिस्तानचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देतो, यामागे नेमक्या काय गोष्टी दडल्या आहेत, हे आम्ही सत्तेवर आल्यानंतर उजेडात आणू. भारताचा पंतप्रधान कोण हे सांगणारा इम्रान खान कोण? यापुढे या देशात नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेतली आहे. एअर स्ट्राईक झाला हे आम्ही मान्य करतो, पण त्याबद्दलची चुकीची आणि परस्परविरोधी माहिती भाजपा नेते पसरवित आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एकही माणूस मारला गेला नाही, असे सांगून खरे बोलल्या. त्यामुळे आम्ही त्यांचे जाहीर आभार मानत आहेत.  

गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांना विस्थापित करणारी ही निवडणूक आहे. या आघाडीतून मी पुन्हा भाजपामध्ये जाणार, अशी अफवा पसरविली जात आहे. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. यापुढे भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे लोक आगामी विधानसभेच्या उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे येतील. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, प्रा. सुकुमार कांबळे, यशपाल भिंगे, शकील पिरजादे, प्रशांत शेजाळ, ब्रम्हानंद पडळकर, नामदेव करगणे, सचिन माळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगलीBJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी