शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकमान्य टिळक हे राष्ट्राचे अमर आदर्श - मोहन भागवत

By शरद जाधव | Updated: December 17, 2023 13:25 IST

मोहन भागवत; सांगलीत लो. टिळक स्मारक मंदिर शताब्दी वर्ष प्रारंभ कार्यक्रम

सांगली : माणूस ज्या स्थानावर पोहोचतो ते त्याच्यामुळे नव्हेतर त्याच्या आचरणामुळे पोहोचत असतो. देश हितासाठी कार्य करताना नेहमीच हीच भावना ठेवून लोकमान्य टिळकांनी त्या काळात काम केले. त्यांच्या याच विचारधारेचा आदर्श घेऊन देशहितासाठी प्राधान्य दिले गेले. टिळकांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात. त्यामुळेच लोकमान्य टिळक हेच राष्ट्राचे अमर असे आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले.

येथील लो. टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यास डॉ. भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले की, कोणतेही उद्दीष्ट मनात ठेवून कार्य केल्यास ती ध्येयप्राप्ती ही होतच असते. टिळकांचेही व्यक्तीमत्त्व असेच होते. त्यामुळे टिळकांचे देशहिताचे विचार तेव्हाही आणि आताही प्रेरणादायीच आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करतानाही डॉ. हेडगेवार यांच्यासमोर टिळकांचे विचार आदर्श होते. त्यांच्या आचरणातून शिकायला मिळाले असल्यानेही संघानेही देशहितासाठी कार्य केले. टिळकांनी स्वत:चा विचार न करता रूजवलेले विचार महत्वाचे होते. टिळकांचा काळ हा वेगळा असलातरी गुणसंपदेवर त्यांनी तो सार्थकी करून दाखविला होता. म्हणूनच त्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक आहेत. माणूस कधीही जूना होत नाही हेच यातून लक्षात येते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, स्मारक मंदिरच्या अध्यक्ष मनीषा काळे, प्रकाश बिरजे, विनायक काळे, श्रीहरी दाते, माणिकराव जाधव, माधव बापट, प्रकाश आपटे, सौरभ गोखले, अमृता गोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMohan Bhagwatमोहन भागवतLokmanya Tilakलोकमान्य टिळक