शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

Crime News Sangli: एकुंडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तरुणीचे सहा दिवसांपूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 7:19 PM

लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी यांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांनी मनाविरोधात लग्न करुन दिल्याने अश्विनी नाराज होती. अश्विनी व लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करून आपापल्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली

जत : जत तालुक्यातील एकुंडी येथे प्रेमीयुगुलाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अश्विनी गजानन माळी (वय २२, रा. एकुंडी, ता. जत, सध्या रा. सलगरे, ता. मिरज) व लक्ष्मण संभाजी शिंदे (२१, रा. एकुंडी, ता. जत) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. एकमेकांना फोन करून दोघांनीही एकुंडी येथील आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.एकुंडी येथील लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र ते घरच्यांना पसंत नव्हते. अश्विनीच्या घरच्यांनी तिचा विवाह सलगरे येथील तरुणाशी एक जूनला करून दिला होता. मात्र तिला लग्न पसंत नसल्याने ती नाराज होती, अशी गावात चर्चा आहे. ती लग्नानंतर रविवारीच (दि, ५) एकुंडी येथे माहेरी आली होती.सोमवारी सकाळी अश्विनी व लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करून आपापल्या घरी विषारी द्रव्य पिल्याचा अंदाज आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान अश्विनी व लक्ष्मणला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या दोन्ही घटनांची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी