शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Vidhan Sabha Election 2024: नेते ‘गुप्त मित्र’ अन् कार्यकर्ते ‘उघड शत्रू’; समाज माध्यमांवर सुज्ञ मंडळी देतायत सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:46 IST

सध्या नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जास्त आक्रमक

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात राज्यातील नेतेमंडळी, उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू असताना कार्यकर्तेही काही कमी नाहीत. त्यांनी समाज माध्यमांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात समाज माध्यमांवर कार्यकर्त्यांचा एकमेकांशी सामना सुरू असताना सुज्ञ मंडळी त्यांना मोलाचा सल्ला देत आहेत. राजकारणात नेते एकमेकांचे ‘गुप्त मित्र’ असतात आणि कार्यकर्ते ‘उघड शत्रू’ असतात अशी ‘पोस्ट’ सध्या चर्चेत आहे.‘राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’ या वाक्याचा अनुभव अनेकदा येत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन वर्षांतील उलथापालथ बघितल्यानंतर हे वाक्य अधोरेखित झाले आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचा माहोल पाहायला मिळत आहे. दिवाळी संपल्यानंतर नेतेमंडळी, उमेदवार यांच्यातील राजकीय दिवाळी पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत प्रचाराचे फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्याचा धुरळा उडाला आहे. नेत्यांबरोबर कार्यकर्तेही सरसावले आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत ‘हम भी कुछ कम नही’ असे दाखवून देण्यास सुरूवात केली आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कालचे राजकीय शत्रू आज मित्र बनल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नेत्यासाठी ‘काय पण’ अशा अविर्भावात वावरणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. रात्रीत आपला नेता राजकीय शत्रूशी हातमिळवणी करत असताना आपण मात्र उगीचच विरोधी नेत्याच्या कार्यकर्त्यांशी शत्रुत्व घेतोय, याची त्यांना जाणीव व्हायला लागली आहे.लोकसभा निवडणुकीत ‘मिरज पॅटर्न’ चर्चेत आणणारे नेते यंदा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे गेले. कवठेमहांकाळला माजी खासदार संजयकाका पाटील यांना विरोध करणारे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी विधानसभेला संजयकाकांचा प्रचार सुरू ठेवला आहे. जतमध्येही लोकसभेच्या उलट विधानसभेला चित्र दिसत आहे. खानापूर-आटपाडीत अशोक गायकवाड यांनी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला. इतर ठिकाणीही असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे नेते एकमेकांचे ‘गुप्त मित्र’ आणि कार्यकर्ते मात्र ’उघड शत्रू’ असतात हे अधोरेखित झाले आहे.

सध्या समाज माध्यमांवर काही कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या समर्थनासाठी एकमेकांशी भिडले आहेत. परंतु, त्यांचे नेते कधी एकत्र येतील हे ते देखील सांगू शकत नाहीत. त्यांना जागृत करण्यासाठी सुज्ञ मंडळी सल्ला देत आहेत. परंतु, त्यांचा सल्ला ऐकतील ते कार्यकर्ते कसले? असा अनुभव येत आहे.नेते बाजूला, कार्यकर्त्यांची उणीदुणीसांगली परिसरातील एका पक्षातील कार्यकर्त्यांची समाज माध्यमांवर चांगलीच जुंपली आहे. सुरूवातीला आपापल्या नेत्याचे समर्थन करून दुसऱ्याच्या नेत्यावर टीकाटिप्पणी सुरू होती. त्यानंतर आता त्यांच्यात वैयक्तिक वाद रंगला आहे. त्यातून एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. नेते बाजूला राहिले असून, कार्यकर्तेच समाज माध्यमावर हमरी-तुमरीवर आल्याचे दिसते.दिवसा मैदानात, रात्री समाज माध्यमावरदिवसभर नेत्यांचा प्रचार करायचा आणि सायंकाळनंतर समाज माध्यमावर विरोधकांच्या टीकाटिप्पणीचा समाचार घेत त्यांना उत्तर द्यायचे, असा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रचारही रंगलेला पाहायला मिळत आहे. सध्या नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जास्त आक्रमक झाल्याचेही दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024