शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 10:01 AM

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.

Jayant Patil ( Marathi News ) सांगली- काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. 'जयंत पाटील यांच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचे शिरसाट म्हणाले, यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आता शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटावर स्वत: जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

“सगळे थोतांड, फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल”; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

"संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे, याचा खुलासा त्यांनाच विचारा. ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे. मी याबाबत अनभिज्ञ आहे. मनाने इकडे आणि शरिराने तिकडे असं भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत. ते असं चालूच असतं.त्यांनीच आता याबाबत खोलात जाऊन सांगायला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.एखाद्या व्यक्तीवर लोकांच्या जास्त लक्ष असेल त्यांच्या विषयी अशा वावड्या उठवल्या जातात, कोण कोणाला जड जातंय हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल, असंही जयंत पाटील म्हणाले. 

शिंदे गटाने केला मोठा गौप्यस्फोट

मंत्रिपदासाठी संजय शिरसाट देखील शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून इच्छुक आहेत. परंतू, त्यानंतर विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे. दुसरा विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा तिघांना उरलेली मंत्रिपदे वाटून देण्यावरून तिढा सुटता सुटत नाहीय. त्यातच ज्यांना मिळणार नाही त्यांचीही नाराजी सोसावी लागेल, या पेचामुळे हा विस्तार रखडलेला आहे. असे असताना संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचा दावा केला आहे.

जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी राम मंदिरात कलश पूजन केले

आज आमदार जयंत पाटील इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात कलश पूजन केले. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे. देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही. मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्व आहे. अयोध्येत दर्शनासाठी आता मी जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे. मी गर्दी कमी असेल तेव्हा नक्की जाणार आहे, असंही पाटील म्हणाले. देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोक आप आपल्या कामाला लागतील. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस