शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Sangli: महावितरणने तोडली कृष्णा नदीवरील शेतीपंपांची वीज, पाणी टंचाईमुळे निर्णय 

By अशोक डोंबाळे | Updated: June 15, 2023 18:51 IST

मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे

सांगली : मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे. ‘जलसंपदा’ने महावितरणला कृष्णा नदीवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महावितरणने दीड हजारांवर कृषिपंपांची वीज खंडित केली आहे. त्यानंतर रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वीज चालू राहणार आहे.कोयना धरणात १२.०७ टीएमसी, तर वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे १४ ते १७ जूनपर्यंत कृष्णा नदीवर उपसा बंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाणी उपसा केल्यास पाणी व विजेचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.त्यानंतरही काही सिंचन योजना बुधवारी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना पत्र पाठवून कृष्णा नदीवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सोडून अन्य सर्व योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली. त्यानुसार महावितरण कंपनीने जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील जवळपास दोड हजार पाणी योजनांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित केला. मात्र पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृष्णा नदीवरील कृषिपंपांचा वीजपुरवठा १४ ते १७ जूनपर्यंत चार दिवस खंडित केला आहे. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेतला असून, पाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर रविवार, दि. १८ ते २० जून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. -धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण. 

कोयना धरणात १२.०७ टीएमसी आणि वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो भरपूर असून अजून दोन महिने पुरेल एवढा आहे. पंधरा दिवसात पाऊस सुरू होणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपसा बंदी घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. हा आदेश मागे घेण्याची गरज आहे. - संजय कोले, शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख.

टॅग्स :SangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीजWaterपाणी