शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

वंचित बहूजन आघाडीतर्फे कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा

By शरद जाधव | Published: September 26, 2023 6:40 PM

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात ...

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. विकासाच्या नावाखाली विविध संस्थांचे झपाट्याने खासगीकरण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तर देशाची अर्थव्यवस्थाच भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी सांगलीत केला.सरकारी नोकरींचे कंत्राटीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी केले. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर टिकास्त्र सोडले.आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने बीएसएनल, एअर इंडियाचे खासगीकरण करत त्यातील कर्मचाऱ्यांची अडचण केली. आता शासनाच्या नव्या धोरणानुसार वर्ग एक पासून सर्वच पदावर कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करण्याचा डाव सुरू आहे. त्यातच संपूर्ण सरकारची मालकी असलेल्या रेल्वे, आरोग्य यंत्रणांचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा संस्था सरकारच्या मालकीच्या राहिल्या नाहीत तर आरक्षणाला अर्थच उरणार नाही. गोरगरीब घरातील मुलांच्या नोकरीची संधीच यामुळे जाणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, अभिजित पाटील, वंचितचे जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवळे, आनंदसागर पुजारी, अलीसो मुलाणी, क्रांतीताई सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

टॅग्स :SangliसांगलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीGovernmentसरकार