शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

तासगावमध्ये बक्षीस योजनेतून लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:42 IST

तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.सोमवारी शेवटचा ड्रॉ असल्याने अनेक ग्राहक तासगावात आले होते. मात्र हा ड्रॉ काढण्यापूर्वीच कंपनीचे चालक पसार झाल्याचे लक्षात ...

तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.सोमवारी शेवटचा ड्रॉ असल्याने अनेक ग्राहक तासगावात आले होते. मात्र हा ड्रॉ काढण्यापूर्वीच कंपनीचे चालक पसार झाल्याचे लक्षात आले. लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याने संबंधित ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची चर्चादेखील आहे. तासगाव येथे काही महिन्यांपासून सरस्वतीनगरमध्ये आॅफिस थाटून ही कंपनी सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे चालक आणि कंपनीसाठी काम करणारे एजंट बहुतांश परजिल्ह्यांतीलच होते.या कंपनीच्या माध्यमातून एजंटांनी ग्रामीण भाग पिंजून काढला होता. शंभर रुपयांत सभासद करून पुढील काही महिने ठराविक दिवसांनी लकी ड्रॉ काढायचा. त्यामध्ये नाव आलेल्या सभासदाला चारचाकी, दुचाकी वाहन, ट्रॅक्टरसह हजारो रुपयांच्या अनेक महागड्या वस्तू, सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. पहिल्या पाच सोडतींसाठी ४९९ रुपये, तर नंतरच्या सहा सोडतींसाठी ८९९ रुपयांचा हप्ता भरायचा होता. इतक्या कमी रकमेत अनेक महागड्या वस्तू स्वस्तात मिळणार, या आमिषाने अनेक लोक बळी पडले.या कंपनीच्या पहिल्या लकी ड्रॉची सोडत २ एप्रिल २०१८ ला झाली होती, तर शेवटची सोडत २७ आॅगस्टला होणार होती. त्यानुसार सोमवारी या योजनेत सभासद झालेले अनेक ग्राहक तासगाव येथे आले. कंपनीच्या संचालकांनी सांगितल्यानुसार शहरातीलच एका कार्यालयात उपस्थित राहिले; मात्र या ठिकाणी कपंनीचा कोणताच प्रतिनिधी दिसला नाही. त्यामुळे आलेल्या ग्राहकांनी सरस्वतीनगर येथे कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र या ठिकाणी कार्यालय गुंडाळून कंपनीच्या सर्वच प्रतिनिधींनी पोबारा केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तालुक्यातील अनेक गावातील ७८ लोकांनी लेखी तक्रार दिली आहे. मात्र घोटाळ्याची व्याप्ती यापेक्षा मोठी असून, याहीपेक्षा अनेक लोकांना गंडा बसला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.ग्राहकाला आठ हजार रुपयांना चुनास्वस्तात मस्त वस्तू घेण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या ग्राहकांत सामान्य लोकांचांच जास्त भरणा आहे. ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भुरळ पाडून गेल्या सहा महिन्यांपासून महिन्याला ठराविक रकमेचे हप्ते गोळा करण्याचे काम राजरोसपणे सुरू होते. कंपनीच्या नियमानुसार आठही सोडतीत मोठे बक्षीस लागले नाही, तरीदेखील बक्षीस न लागलेल्या ग्राहकांना फ्रीजचे हमखास वाटप होणार होते. त्यामुळे अनेक ग्राहक सहज गळाला लागले. सुमारे आठ हजार रुपये प्रत्येक ग्राहकाकडून कंपनीकडे भरण्यात आले होते. आता कंपनीच्या प्रतिनिधींनी पोबारा केल्याने प्रत्येक ग्राहकाला आठ हजार रुपयांचा चुना लागला आहे.