शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

मिरज-कृष्णाघाट रेल्वे गेट मंगळवारपासून एक महिना बंद

By अविनाश कोळी | Published: October 01, 2023 9:01 PM

उड्डाणपुलाच्या कामासाठी निर्णय : रेल्वेमार्गापलीकडील वसाहतीचा रस्ताही बंद

अविनाश कोळी, मिरज : मिरज कृष्णाघाटदरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे गेट दि. ०३ ऑक्टोबरपासून एक महिना बंद करण्यात येणार आहे. रेल्वेमार्गापलीकडे वसाहतींकडे जाणारे रेल्वे गेट क्रमांक एक यापूर्वीच बंद करण्यांत आल्याने येथील नागरिकांना येण्या-जाण्याचा रस्ता बंद होणार आहे. येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालून रेल्वे गेट खुले करण्याची मागणी केली आहे.

मिरजेत रेल्वेस्थानकापलिकडे कोल्हापूर चाळ, वाघमारे प्लॉट सावित्रीबाई फुले झोपडपट्टीकडे जाण्यासाठी रेल्वे गेट क्रमांक एक रेल्वेने बंद केल्याने येथील दोन हजार नागरिकांची कृष्णाघाट मार्गावरून ये-जा सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेट बंद करताना पर्यायी रस्ता देण्यात आला होता. तेथेही रेल्वेमार्गाचे काम सुरू केल्याने या मातीच्या रस्त्यातून जाता-येता येत नाही. येथील महिलांना कामासाठी बाहेर जाता येत नाही. शाळकरी मुला मुलीना दुचाकीवरुन रेल्वेमार्गापलीकडे जाता येत नाही. आता कृष्णाघाट रस्त्यावरील गेट एक महिन्यासाठी बंद झाल्यास या वसाहतीत वाहने जाण्यास रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे मिरज-जयसिंगपूरदरम्यान रेल्वे गेटक्रमांक एक सुरू करून देण्याची मागणी रणधीर कांबळे, नानासाहेब वाघमारे यांच्यासह सावित्रीबाई फुले वसाहत, वाघमारे प्लाॅट येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :miraj-acमिरज