शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

मिरज पाणी योजना ‘एमजीपी’कडे?

By admin | Published: July 07, 2017 11:24 PM

मिरज पाणी योजना ‘एमजीपी’कडे?

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वादग्रस्त मिरज पाणीपुरवठा योजनेची १०३ कोटीची निविदा महासभेने रद्द केली आहे. त्यात स्थायी समितीने निविदा रद्दला विरोध केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही तसे संकेत देत, राज्य शासन सर्वोच्च असून, ते असा निर्णय घेऊ शकतात, असे सांगत महासभेला धक्का दिला आहे. अमृत योजनेतून मिरज पाणीपुरवठा योजनेसाठी १०३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ८७ कोटीची निविदाही प्रशासनाने प्रसिद्ध केली होती. या निविदेवरून महासभा विरूद्ध स्थायी समिती असा वाद निर्माण झाला आहे. निविदा दर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे असतानाच महासभेने निविदा रद्द करण्याचा ठराव केला आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांच्या वादात या योजनेचे काम रखडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचे काम महापालिकेकडून काढून घेऊन ते एमजीपीकडे देण्यात येणार असल्याचीही जोरदार चर्चाही सुरू होती. त्याबाबत आयुक्त खेबूडकर यांना विचारता ते म्हणाले की, राज्य शासन हे सर्वोच्च आहे. ते कोणताही निर्णय घेऊ शकते. जीवन प्राधिकरणकडे योजना वर्ग करतील अथवा अन्य त्रयस्थ विभागाकडून काम करून घेतील. शासन जो निर्णय देईल, त्याची प्रशासन अंमलबजावणी करेल. महासभेचा निविदा रद्दचा ठरावही आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ. स्थायी समितीचा ठराव शासनाकडे पाठविला आहे. पण त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. या योजनेत लोकहित महत्त्वाचे आहे. कोल्हापूर महापालिकेने सहावेळा निविदा काढूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. खेबूडकर इथे आहेत, म्हणून योजना मंजूर झालेली नाही. महापालिकेवरील बोजा कसा कमी होईल हे आम्ही पाहणार. इचलकरंजीची निविदा कमी दराने आली, त्याचाही अभ्यास करू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. २५ हजार वृक्ष लागवडसांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात २५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून अजूनही ४ हजार झाले लावली जाणार आहेत. ही झाडे जगविण्यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील झाडांना एक हजार ट्री गार्ड देणार आहोत. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी नवीन टँकरही खरेदी करणार असल्याचे खेबूडकर यांनी सांगितले.