शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सांगली जिल्ह्यातील बिऊरच्या गवती चहाची मुंबईकरांना भूरळ

By हणमंत पाटील | Published: January 18, 2024 4:27 PM

विकास शहा शिराळा : बिऊर ( ता.शिराळा ) गाव आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ...

विकास शहाशिराळा : बिऊर ( ता.शिराळा ) गाव आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.  येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करुन मुंबई मार्केटमधे अल्पावधीत गवती चहाचे गाव अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.अल्प भुधारक व शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत आसून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अलिकडच्या काही वर्षात वातावरणातील बदल पावसाची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.परिणामी शेतीवरती उदरनिर्वाह असणारे  शेतकरी वर्षभर उत्पादन देणाऱ्या  पिकाकडे कल वाढलेला पहावयास मिळत आहे.गवती चहा ही तृणवर्गीय वनस्पती असून  एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरु होते. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करता येते.साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. गेल्या चार पाच वर्षापासून या परिसरात  काही  शेतकऱ्यांनी हे पिक घ्यायला सुरवात केली. अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला.मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जिवानू खताचा वापर करुन  गावखताचा मोठ्या प्रमाणात वापर व पाण्याचे योग्य नियोजन वेळेवर आंतरमशागत किटकनाकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरूवात झाली. मुंबई मार्केटमध्ये या तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत त्यामुळे येथे मार्केटला माल पाठवायला सुरूवात झाली. या परिसरात लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची योग्य जमीन जमीन आहे.त्यामुळे कमी खर्चात ऊसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे.अलिकडच्या काळात खूप जण गवती चहा पिणे पसंत करतात. गवती चहा ही अशी वनस्पती आहे ज्यामुळे चहाची चव वाढते. यामुळे बऱ्याच जणांच्या घरी अगदी आवर्जून गवती चहा पितात. त्याचबरोबर  यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. 

योग्य नियोजन गवती चहा हे पिक इतर पिकापेक्षा परवडणारे आहे व कमी खर्चात कमी क्षेत्रात येते.त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या पिकाला करपा रोगाचा  प्रार्दुर्भाव जास्त असतो.वेळेवर औषध फवारणी केली तर नियंत्रण करता येते.  - सचिन पाटील ( माजी सैनिक ) शेतकरी बिऊर - शांतीनगर 

टॅग्स :SangliसांगलीMumbaiमुंबई