शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

...तर दोघांनी पळून जावून लग्न करावे; प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

By शीतल पाटील | Published: October 02, 2023 10:05 PM

इंडिया आघाडीत सामील होण्याच्या मुद्दावरून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यात आले आहे.

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू असतानाच डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्यास दोन भडजी आडवे येत असल्याचा आरोप केला होता. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत दोघेजण लग्नाला उत्सूक असतील आणि भडजी आडवे येत असतील तर पळून जावून लग्न करावे, असा टोला लगाविला.

इंडिया आघाडीत सामील होण्याच्या मुद्दावरून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यात ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या युतीची चर्चा राज्यभर सुरू आहे. मध्यंतरी ठाकरे व आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. आंबेडकर यांनी निवडणुकीबाबत शिवसेनेशी चर्चा झाली आहे. लग्नाची तारीख ठरली असली तरी दोन भडजी आडवे येत आहेत. एक राष्ट्रवादी तर दुसरा काँग्रेस असल्याची टीका केली होती.

त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले की, दोघेही लग्नाला उत्सूक आहेत. त्यांचा साखरपुडा झाला असेल आणि भटजी अडथळे आणत असतील तर पळून जाऊन लग्न करावे. इंडिया आघाडीत सामील होणाऱ्या पक्षाचे आम्ही स्वागतच करू. भाजला विरोध करणे हाच मुख्य उद्देश आहे. पण आघाडीची ध्येयधोरणे सहभागी पक्षांना मान्य करावी लागतील. डाॅ. आंबेडकर सकारात्मक असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांची उद्ध्व ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. ठाकरे आम्हाला सांगतील. भाजपला विरोध करणाऱ्याला कुणालाही आम्ही टाळणार नाही, असेही पाटील म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडेच राहील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी (दि. ६) सुनावणी होणार आहे. तेथे आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. देशभरात २३ राज्यांत राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. त्यातील १९ राज्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. पक्षकार्यकर्त्यांचे केडर शरद पवारांसोबत मताधिक्याने आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे. पक्ष हा आमदारांचा नसून कार्यकर्त्यांचा असतो. तो कार्यकर्त्यांचाच आणि पर्यायाने शरद पवार यांच्याकडेच राहील.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर