शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे शुद्धीकरण

By admin | Published: June 01, 2017 11:46 PM

आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे शुद्धीकरण

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : वैभव शिंदे भाजपमध्ये गेले असले तरी, त्यांचे वडील विलासराव शिंदे हे आजही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आष्ट्यात विलासराव शिंदे यांचाच शब्द प्रमाण मानला जात असल्याने राष्ट्रवादीच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील गटासोबत असलेले जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांनी, शिंदे व शिगावचे स्वरूप पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे शुध्दीकरणच झाल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे दिली.आष्टा पालिकेवर शिंदे गटाचे बहुमत असले तरी, आमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली आहे. सध्या पालिकेत २३ नगरसेवक आहेत. त्यामध्ये शिंदे गटाकडे नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्यासह सारिका मदने, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, धैर्यशील शिंदे, शैलेश सावंत, बाळासाहेब सिध्द, संगीता सूर्यवंशी, शहनवाज देवळे, शारदा खोत, प्रतिभा पेटारे, मंगलादेवी शिंदे असे ११, तर आमदार पाटील गटाकडे रुक्मिणी अवघडे, विजय मोरे, प्रकाश घस्ते, अर्जुन माने, मनीषा जाधव, पुष्पलता माळी, राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष जगन्नाथ बसुगडे, तेजश्री बोंडे, शकीर मुजावर हे ९ नगरसेवक आहेत. विलासराव शिंदे यांना मानणारे नगरसेवक इस्लामपूर येथील वैभव शिंदे यांच्या भाजपप्रवेश कार्यक्रमास आले नव्हते. नगराध्यक्षा स्नेहा माळी आणि शिंदे गटाचे नगरसेवक आजही राष्ट्रवादीतच आहेत. विलासराव शिंदे जो आदेश देतील, त्यानुसार पालिकेच्या राजकारणात सक्रिय असल्याचे नगराध्यक्षा सौ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.याउलट बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे यांना पाडून निवडून आलेले अपक्ष, पण आ. पाटील गटासोबत असणारे संभाजी कचरे परिसरात पक्ष भक्कम करण्याच्या तयारीला लागले आहेत. वैभव शिंदे व स्वरूप पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे शुद्धीकरण झाले आहे. आष्टा परिसरात आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार, शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. त्यामुळे वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीवर कसलाही परिणाम होणार नाही, असे कचरे यांनी स्पष्ट केले.स्वरूप पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले, की सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेल्यांबाबत आपल्याला काहीच बोलायचे नाही. दरम्यान, या प्रवेशाने आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार, याकडे लक्ष लागले आहे.निष्ठावान कोण, गद्दार कोण?आमदार जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील निष्ठावान आनंदराव शिंदे, धोंडीराम मस्के, बाबासाहेब ढोले, शंकरराव शिंदे, वसंत आवटी, बाळासाहेब वग्याणी आणि राजारामबापू उद्योग समूहाची उभारणी करण्यात आघाडीवर असणारे नानासाहेब फडतरे यांना सबुरीचा सल्ला दिल्यानेच येथे शिंदे गट वरचढ ठरला आहे. यापुढील काळात निष्ठावान आणि गद्दार कोण, याची तपासणी आ. पाटील यांनी करावी, अशी मागणी होत आहे.मंत्रालयात पुन्हा घुसण्यासाठीच....भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवसापर्यंत, भाजपमध्ये जाणार नसल्याचे आ. पाटील यांना सांगणारे स्वरूप पाटील भाजप प्रवेशाच्या रांगेत पुढे होते. यापूर्वी आ. पाटील मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयात वाऱ्या असायच्या. आता आ. पाटील यांच्याकडे मंत्रीपद नसल्याने स्वरूप पाटील यांना मंत्रालयाचे दरवाजे बंद झाले आहेत. मंत्रालयात पुन्हा घुसण्यासाठीच स्वरूप पाटील सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आता भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत.