जयंत पाटील यांनी दुष्काळी जत तालुक्याला विस्तारित म्हैसाळ योजना कार्यान्वित करून पाणी देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे दुष्काळ हटण्यास मदत होणार असून, योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी म्हणून शनिवार, दि. ११ रोजी संख येथे राजारामबापू पाटील प्रशाला येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. यासाठी तालुक्यात संवाद यात्रा चालू केली आहे. या यात्रेचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे, अशी माहिती बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिली.
या संवाद यात्रेत सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, माजी उपसभापती जे. के. माळी, कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, सचिव सुभाष बसवराज पाटील, जत बाजार सभापती देयगोंड बिराजदार, सिद्ध शिरसाड, शंकरराव गायकवाड, माजी नगरसेवक भैया कुलकर्णी सहभागी झाले होते.
जमदाडे म्हणाले की, ही संवाद यात्रा निगडी खुर्द, काराजनगी, कोळगिरी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, धुळकरवाडी, मोटेवाडी, कागनरी, तिकोंडी, पांडोझरी, खंडनाळ आदी गावांमध्ये गेली. आम्ही ६५ गावांचा दौरा करून जनतेला आवाहन करत आहोत. आगामी काळात तालुका राष्ट्रवादीमय होईल.