शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

द्राक्षबागायदार शेतकऱ्यांवर नवे संकट; अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 1:33 PM

मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत.

सांगली : अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले सुरु झाले आहेत. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत.सध्या द्राक्षमण्यांत साखर भरु लागली आहे. घड पक्व झाले आहेत. ही टपोरी द्राक्षे वटवाघळांच्या हल्ल्याचे बळी ठरु लागली आहेत. रात्री दहा-अकरानंतर वटवाघळांचे थवे बागेत घुसतात, रात्रभर धुमाकूळ घालतात. खाणे कमी, पण नासधुसच प्रचंड प्रमाणात करतात. सकाळी शेतकरी बागेत जातो, तेव्हा बागेत सर्वत्र विखरुन पडलेले द्राक्षघड दिसतात. एका रात्रीत दोन-तीन एकर बागेचा सुपडासाफ होतो.वटवाघळांपासून बचावासाठी बागांभोवती जाळी लपेटावी लागत आहे. यापूर्वी पक्ष्यांसाठी हलकी जाळी लावली जायची, पण वटवाघळांसाठी जाडसर जाळी लावावी लागत आहे. काही शेतकरी बागेत रात्रभर प्रखर दिवे लावून ठेवत आहेत. तीव्र प्रकाशापासून वटवाघळे दूर राहतात, बागेचा बचाव होतो. काही बागांत मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा प्रयोगही शेतकऱ्यांनी  केला आहे.महामार्गासाठी वृक्षतोडीने वटवाघळे झाली सैरभैररत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी ४७ हजारहून अधिक झाडे तोडण्यात आली. शंभर-दोनशे वर्षे जुन्या वडाच्या झाडांच्या गर्दीचा मिरज-पंढरपूर मार्ग वृक्षतोडीने उजाड झाला. हजारो वटवाघळांची आश्रयस्थाने नष्ट झाली. सैरभैर झालेली वटवाघळे महामार्गानजिकच्या गावांत शेतांतील झाडांवर मुक्कामाला येत आहेत. रात्री द्राक्षबागांमध्ये घुसत आहेत. महामार्गाच्या कामाचा हा विपरीत परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

दलालांनी बागांचे करार केले आहेत. आम्ही आगाऊ रकमादेखील घेतल्या आहेत. दलालाकडून द्राक्षाची छाटणी होईपर्यंत  बाग जीवापाड सांभाळावी लागत आहे. वटवाघळांपासून बचावासाठी रात्रभर जागे रहावे लागत आहे.- रामगौंड पाटील, द्राक्ष शेतकरी, लक्ष्मीवाडी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी