शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही, गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:57 PM

भारतीय संविधानानेच देशांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणाऱ्या भारत देशाला स्वाभिमानी बनविले.

आटपाडी : भारतीय संविधानानेच देशांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणाऱ्या भारत देशाला स्वाभिमानी बनविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला देशातील कोणताही राजकीय पक्ष बदलू शकत नाही, असे प्रतिपादन आ. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीत फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आयोजित भारतीय संविधान जनजागृती सप्ताह उद्घाटनप्रसंगी केले.व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भवानी एज्युकेशन सोसायटीचे रावसाहेब पाटील, अनिल पाटील, नवनीत लोंढे, साहेबराव चवरे, नंदकुमार केंगार, लक्ष्मण मोटे उपस्थित होते.आ. पडळकर म्हणाले की, आटपाडीमध्ये सुरू असणारा संविधान सप्ताह पुढील वर्षांपासून मोठ्या स्वरूपात राबविणार आहे. बहुजनांचे नाव घेऊन अनेक नेत्यांनी स्वत:चा उद्धार करून घेतला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम काही मंडळींनी राजकीय द्वेषापोटी केले.देशमुख म्हणाले की, खुल्या गटामध्ये संविधानावर आधारित स्पर्धा घेण्यात यावी. त्यामुळे भारतीय संविधानाबद्दल जनजागृती घडून येण्यास मदत होईल.आंबेवाडीचे सुपुत्र सेवानिवृत्त मेजर महादेव शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन, तर कौठुळीचे सुपुत्र सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक डी. एस. सावंत यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी स्वागत, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. अर्चना काटे यांनी आभार मानले. यावेळी तुषार लोंढे, धनंजय वाघमारे, हनुमंत खिलारी, सुरेश मोटे, रणजित ऐवळे, समाधान ऐवळे, विवेक सावंत, शरद वाघमारे उपस्थित होते.आरक्षणाचे राजकारणमॉरिशस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी ‘ओबीसी आरक्षण आणि भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. एका रात्रीमध्ये सरकार बदलता येते, पण राज्यघटना बदलता येत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून ओबीसी आरक्षणाचे राजकारण चालू आहे, पण ते पूर्ण क्षमतेने देण्याचा प्रयत्न होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकर