शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

वसंतदादा कारखान्याला नोटीस

By admin | Published: February 24, 2016 12:47 AM

२२ कोटी तातडीने भरा : विनापरवाना हंगाम; साखर आयुक्तांची कारवाई

सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याने दोन वर्षांतील उसाची बिले थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हंगाम सुरू ठेवल्याने साखर आयुक्तांनी २२ कोटींच्या दंडाची नोटीस सोमवारी कारखान्याला पाठविली. त्यानंतर लगेचच मंगळवारी दुसरी नोटीस बजावून दंड तत्काळ भरला नाही, तर जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा दिला आहे.वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन वर्षांतील ऊस गाळपाचे पंधरा कोटींचे बिल शेतकऱ्यांना दिलेले नाही, या कारणावरून साखर आयुक्तांनी २०१५-१६ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना दिला नव्हता. शासनाने परवाना दिला नसतानाही, कारखाना प्रशासनाने गळीत हंगाम सुरू केला आहे. कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २१ हजार ६० टन उसाचे गाळप करून ५ लाख ४८ हजार ५०० क्विंटल साखर तयार केली आहे. याप्रश्नी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्त कार्यालयात सुनावणी होऊन, विनापरवाना कारखाना सुरू ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी सोमवारी वसंतदादा कारखाना प्रशासनाला २२ कोटींच्या दंडाची नोटीस बजावली होती. मंगळवारी साखर आयुक्तांनी पुन्हा दुसरी नोटीस बजावून, २२ कोटी दंडाची रक्कम भरावी, अन्यथा कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. नोटिसीमुळे कारखाना प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, यंदाच्या हंगामामधील दि. १ डिसेंबर ते २२ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या ऊस गाळपाची बिले मिळालेली नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांची या गळीत हंगामातीलही कोट्यवधीची थकबाकी कारखान्याकडेआहे. त्यामुळे या थकबाकीप्रश्नीही कारखान्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)जप्तीची कारवाई पूर्ण कधी होणार?वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांना थकीत बिलाची रक्कम दिली नसल्याने शेतकरी संघटनेने दोन वर्षांपूर्वी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मिरजेच्या तहसीलदारांनी कारखान्याच्या साखर गोदामास टाळे ठोकून जप्तीची कारवाई केली होती. जप्त साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी भागविली असती, तर सध्या कारखान्यासमोर अडचणी निर्माण झाल्या नसत्या, असा संचालक मंडळाचा दावा आहे. जप्तीच्या कारवाईमुळे जमीन विक्रीही थांबली असून, कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे.