शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 1:11 PM

महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला.

नेर्ले : महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय हा बदल करता येत नाही. तरीही एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला. यापुढे इथेनॉलमधील ७५ टक्के हिश्शासाठीही लढा उभारणार असल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.तांबवे (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, ॲड. एस. यू. संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहाेत. एफआरपीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदार तयार नव्हते. मात्र, स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. पहिली उचल २२०० ते २३०० रुपये देण्याचे त्यांचे धोरण होते. याने शेतकऱ्यांची सोसायटी तरी फिटली असती का? जिल्हा बँका कारखानदारांना १३ टक्के व्याजाने पैसे देतात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येऊन गेला; पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. पण, यावेळी कोणालाही सोडणार नाही.जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मुर्दाड आहेत. संघटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्नावर संसदेत आवाज उठवला का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललेत का? त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी देणे-घेणे नाही.युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी स्वागत केले. संतोष शेळके, जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकर पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी संयोजन केले.

शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे बुडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा आंदाेलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी