शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

टँकरची संख्या पोहोचली ७० वर...

By admin | Published: February 11, 2016 12:19 AM

जिल्ह्यात टंचाई वाढली : पन्नास कोटीच्या नळपाणी योजनेचा शासनाकडे प्रस्ताव सादर

अंजर अथणीकर -- सांगलीजिल्ह्यामध्ये टंचाई वाढत असून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या ७० वर पोहोचली आहे. आणखी वीसहून अधिक टँकरसाठी मागणी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३०४ गावे व वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५० कोटीच्या नळपाणी पुरवठ्याच्या १०४ योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची तीव्रता जाणवत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. गेले वर्षभर जिल्हा संपूर्ण टँकरमुक्त होता. यावर्षी मात्र आॅक्टोबरपासूनच टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या ५७ गावे, ४५१ वाड्या-वस्त्यांवर एकूण ७० टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. टंचाईची झळ १ लाख ५५ हजार लोकसंख्येला बसली आहे. भाडेपट्ट्याने ६३, तर शासकीय ७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या दररोज १८३ खेपा करण्यात येत आहेत.योजनेचे प्रस्ताव : मार्चअखेर मंजुरी शक्य... जानेवारीपासून अनेक गावांतून नळपाणी योजनेसाठी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ३०४ गावे व वाड्यांमध्ये १०४ नळपाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासाठी जवळपास ५० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सादर केला आहे. याला मार्चअखेरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ३२ कोटीच्या जूनअखेरपर्यंतच्या टंचाई आराखड्यास मंजुरी घेण्यात आली आहे. मंजुरीनंतर तात्काळ नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.