शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sangli: 'शक्तिपीठ' नको म्हणून हरकत घेतली, सुनावणी कधी घेणार?, बारा गावातील शेतकऱ्यांचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल

By अशोक डोंबाळे | Updated: February 27, 2025 17:58 IST

१९ गावांमध्ये उद्या काळा दिवस पाळणार, २३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणार

सांगली : हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, म्हणून आम्ही हरकत घेतली आहे. या हरकतीवर सुनावणी कधी घेणार आहे, असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, सक्तीच्या भूसंपादनाचा दि. २८ फेब्रुवारीला १९ गावांमध्ये शेतकरी काळ दिवस पाळणार असून, घरावर काळ्या गुड्या उभारणार आहे, असेही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले.दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गला सांगली जिल्ह्यातील १९ गावातून तीव्र विरोध आहे. द्राक्ष, डाळिंब, ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे. अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे. कुणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन, बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकाही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग कुणासाठी केला जातोय, हे सरकारने जाहीर करावे.शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याचीही त्यांनी मागणी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे. शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या २०१३ भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, गजानन पाटील, विष्णू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जमदाडे, सुभाष जमदाडे, शिवाजी शिंदे, प्रकाश टकले, पांडुरंग पवळ, रमेश कांबळे व इतर शेतकरी उपस्थित होते.

२३ मार्चला शेतकरी रस्त्यावर उतरणारराज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दबाबतचे शासकीय परिपत्रक २३ मार्चपूर्वी काढले पाहिजे. शासनाने २३ मार्चपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही तर शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीnagpurनागपूरgoaगोवाhighwayमहामार्गFarmerशेतकरी