शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जुने पंधरा चेहरे पुन्हा मैदानात

By admin | Published: January 20, 2017 11:06 PM

जिल्हा परिषद : माजी अध्यक्षांसह उपाध्यक्षांचा समावेश; विविध पक्षांकडे उमेदवारीची मागणी

सांगली : जिल्हा परिषदेच्या सभागृहात पूर्वी काम केलेल्या सदस्यांचे मतदारसंघ पुन्हा खुले झाल्यामुळे, यंदाच्या निवडणूक मैदानात उतरण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यात माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह पंधराजणांचा समावेश आहे. पाच जणांनी पक्षांतर केल्यामुळे ते नवीन पक्षाचिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.जिल्हा परिषद मतदार संघांत आरक्षण पडल्यामुळे २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीपासून अनेकांना दूर राहावे लागले होते. देवराष्टे्र गटातून १९९८ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर मालन मोहिते विजयी झाल्या होत्या. पुढे १९९९ ते २००२ या कालावधित त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही झाल्या. पुढे पंधरा वर्षे हा मतदारसंघ विविध घटकांसाठी आरक्षित राहिला. यामुळे त्यांना निवडणूक मैदानात उतरता आले नाही. परंतु, आता त्यांचा मतदारसंघ पुन्हा महिलांसाठी खुला झाला आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसच्या चिन्हावर भोसे गटातून २००७ मध्ये विजयी झालेल्या कांचन पाटील यांनाही २००७ ते २००९ या कालावधित अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. २०१२ च्या आरक्षण सोडतीमध्ये त्यांचा मतदारसंघ दुसऱ्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांची संधी हुकली होती. आता त्यांचा मतदारसंघ पुन्हा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्या इच्छुक आहेत. मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, हे निश्चित झाले नाही. २००७ च्या निवडणुकीत सत्यजित देशमुख जिल्हा परिषदेत आले होते. त्यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. यांचा कोकरूड मतदारसंघ यावेळी खुला झाल्यामुळे ते मैदानात उतरणार आहेत. पुढची अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत. बोरगाव गटाचे २००७ मध्ये नेतृत्व केलेले जितेंद्र पाटील यांचा मतदारसंघ पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे तेही इच्छुक आहेत. त्यांचाही अध्यक्षपदावर दावा आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर विसापूर गटातून २००७ मध्ये विजयी झालेले सुनील पाटील यांचा मतदारसंघ २०१२ मध्ये आरक्षित झाला. यामुळे त्यांना पाच वर्षे थांबावे लागले. सध्या ते काँग्रेस अथवा भाजपच्या चिन्हावर मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.चिकुर्डे (ता. वाळवा) गटातील अभिजित पाटील २००७ मध्ये काँग्रेसकडून विजयी झाले होते. आरक्षणामुळे त्यांनाही पाच वर्षांची सुटी मिळाली होती. त्यांचा मतदारसंघ पुन्हा खुला झाला असून ते तयारीत व्यस्त आहेत. यावेळी ते शिवसेनेकडून निवडणूक लढविणार आहेत. हुतात्मा आघाडीच्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी २००७ ते २०१२ या कालावधित वाळवा मतदारसंघातून सदस्या होत्या. त्यांचा मतदारसंघ २०१२ मध्ये खुला झाल्यामुळे, येथून गौरव नायकवडी मैदानात उतरले होते. आता हा मतदारसंघ महिलेसाठी राखीव झाल्यामुळे प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांच्या नावाची चर्चा आहे. बाज (ता. जत) गटातील आकाराम मासाळ २००७ मध्ये निवडून आले होते. त्यांना समाजकल्याण विभागाच्या सभापती पदाची संधी मिळाली होती. यांचाही मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले होते. यावर्षी पुन्हा हा मतदारसंघ खुला झाल्यामुळे ते निवडणूक मैदानात उतरले आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीकडून होते. यावेळी ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. शिवाजी डोंगरे सलग दहा वर्षे माधवनगर (ता. मिरज) जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करीत आहेत. यावेळी त्यांचा मतदारसंघ महिलांसाठी खुला झाल्यामुळे, त्यांच्या पत्नी येथून निवडणूक लढविणार आहेत, तर कवलापूर खुल्या गटातून डोंगरे स्वत: निवडणुकीच्या मैदानात आहेत. पूर्वी ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक मैदानात होते. यावेळी भाजपकडून उतरणार आहेत. (प्रतिनिधी) पुन्हा जिल्हा परिषदेत :येण्याची शक्यता...अभिजित पाटील (चिकुर्डे, ता. वाळवा), सत्यजित देशमुख (कोकरूड, ता. शिराळा), जितेंद्र पाटील (बोरगाव, ता. वाळवा), प्रा. डॉ. सुषमा नायकवडी (वाळवा), अ‍ॅड्. चन्नाप्पा होर्तीकर (उमदी, ता. जत), छायाताई पाटील (कामेरी, ता. वाळवा), सुनील पाटील (विसापूर, ता. तासगाव), दादासाहेब सूर्यवंशी (अंकलखोप, ता. पलूस), संग्राम पाटील (भिलवडी, ता. पलूस), अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक (नागेवाडी, ता. खानापूर), शिवाजी डोंगरे (कवलापूर, ता. मिरज), कांचन पाटील (भोसे, ता. मिरज), मालन मोहिते (देवराष्ट्रे, ता. कडेगाव), आकाराम मासाळ (बाज, ता. जत), बसवराज बिराजदार (जाडरबोबलाद, ता. जत)