शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १९ तासानंतर जातोय एकाचा अपघाती बळी

By घनशाम नवाथे | Updated: January 14, 2025 18:24 IST

अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त

घनश्याम नवाथे सांगली : जिल्ह्यात अपघात स्थळे नाहीशी केली जात असून रस्तेही मोठे झालेत. परंतु अपघातांची मालिका काही थांबतच नसल्याचे दिसून येते. गतवर्षात ९४२ गंभीर अपघात होऊन त्यामध्ये ४४९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. जिल्ह्यात दर १९ तासाला एकाचा अपघाती बळी जात असल्याचे भयानक चित्र दिसून येते.जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणारी ठिकाणे होती. वर्षानुवर्षे याठिकाणी धोका असल्याचे फलक दिसत होते. अखेर अपघाताची ठिकाणेच नामशेष करण्याचे आदेश आल्यानंतर ‘ब्लॅक स्पॉट’ हटवले जात आहेत. आता केवळ मोजकेच ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.दुसरीकडे रस्तेही मोठे झालेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, वेडीवाकडी वळणे, गतिरोधक, धोकादायक चढ-उतार आदीमुळे होणारे अपघात कमी झाले आहेत. बेदरकारपणा, वेगाची नशा, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदीमुळे अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याचे आव्हान उभे राहिले आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

अपघाताचे प्रमाण वाढलेगतवर्षात ७२७ गंभीर अपघात होऊन ३४४ जणांचा बळी गेला होता. यंदाच्या वर्षात ९४२ अपघात होऊन ४४९ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षाच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.

दररोज १५० ते १७५ नवीन वाहनेवाहन संख्येचा वेग वाढतच चालला आहे. जिल्ह्यात दररोज १५० ते १७५ नवीन वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. गतवर्षात नवीन ६७ हजार वाहनांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण वाहन संख्या डिसेंबर २०२४ अखेर १३ लाख ८३ हजार ४७५ इतकी आहे.

अपघाताची कारणेसर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. निष्काळजीपणे, नागमोडी वळण घेणे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे. नशेत वाहन चालवणे. स्वत:च्या कौशल्यावर फाजील आत्मविश्वास असणे. विना हेल्मेट दुचाकी चालवणे. मोटार चालवताना सीटबेल्ट न वापरणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत.

कायद्याने ठरवलेली कमाल वेगमर्यादावाहनप्रकार - एक्स्प्रेस हायवे - चौपदरी महामार्ग - महापालिका क्षेत्र इतर रस्तेआसन क्षमता ८ - १२०  - १००  -  ७०  - ७०आसन क्षमता ९ पेक्षा जास्त - १००  - ९० -  ६०  -  ६०सर्व मालवाहू वाहने - ८०  - ८०  - ६० - ६०दुचाकी -  (परवानगी नाही) - ८० - ६० -  ६०तीनचाकी वाहने -   ५०  -  ५०  - ५०

अपघात कसे टाळाल

  • दुचाकी चालवताना पुढील वाहनापासून दोन सेकंदाचे अंतर ठेवा. रात्री व पावसाळ्यात ३-४ सेकंदाचे अंतर ठेवा
  • वाहनाचा वेग वारंवार तपासा. वेग जास्त असेल तर वाहन थांबण्यास वेळ लागतो.
  • ओव्हरटेक उजव्या बाजूनेच करा.
  • वाहन नेहमी सुस्थितीतच ठेवा.
  • वाहतूक नियमांचे पालन करा.

सुरक्षा अभियान सतत हवेआरटीओ कार्यालय, पोलिस प्रशासन आणि बांधकाम विभागातर्फे जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. पूर्वी सप्ताह होता. त्यानंतर पंधरवडा झाला. यंदा महिनाभर सुरक्षा अभियान राबवले जात आहे. परंतु अपघातांची वाढती संख्या पाहता अभियान सतत सुरू ठेवण्याची गरज भासत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू